Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना

घरी पुरवठा होणारे दूषित पाणी पिऊन मुली आजारी पडल्याचा पीडित कुटुंबांचा आरोप आहे. स्थानिक रहिवाशांनी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 06, 2025 | 12:30 PM
Solapur News: दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर: सोलापूरच्या बाबासाहेब जगजीवन राम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. भाग्यश्री म्हेत्रे (वय १६) आणि जिया म्हेत्रे (वय १६) अशी मृत मुलींची आहेत. जयश्री महादेव म्हेत्रे (वय १८) हीची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणावरुन सोलापूरकर आक्रमक झाले असून पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

घरी पुरवठा होणारे दूषित पाणी पिऊन मुली आजारी पडल्याचा पीडित कुटुंबांचा आरोप आहे. स्थानिक रहिवाशांनी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोलापूरला सतत पाणी दूषित होण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. दोन मुलींच्या मृत्यूमुळे आता सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोलापूरमध्ये होणाऱ्या दुषित पाणी पुरवठ्यामुळे मुली आजारी पडल्याचा आरोप हाेत अाहे.

कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

बाबासाहेब जगजीवन राम झोपडपट्टीत मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे या मुलींचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले आहे.

इंद्रायणी पुन्हा फेसाळली: आळंदीत नागरिकांच्या आरोग्याला धोका

पिंपरी चिंचवड महानगर पालिका, तसेच उगमस्थानापासून विविध ठिकाणी नदीपात्रात मिसळत जाणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला आता हिमनगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शुक्रवारी (दि. ४) सकाळपासून इंद्रायणीच्या पात्रात पांढराशुभ्र फेसाचे मोठ्या आकारातील थर तरंगत असल्याने भाविकांचे, तसेच जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणाची पातळी मोठी असल्याने इंद्रायणीच्या पात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

चिखली, कुदळवाडीतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केल्यानंतर इंद्रायणीतील प्रदूषण कमी होईल, असा दावा तेथील राजकीय मंडळी करत होती. मात्र, हा दावा पूर्णतः फोल ठरला आहे. कारण, अद्यापपर्यंत इंद्रायणीच्या प्रदूषणाची पातळी अजिबात कमी झाली नाही. याउलट महापालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे दिवसेंदिवस इंद्रायणीतील पाण्याला उग्र वास, कधी हिरवट तर कधी काळपट रंग होत आहे. याचबरोबर इंद्रायणीच्या उगमस्थानापासून विविध ग्रामपंचायती, नगरपरिषद हद्दीतील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळले जात आहे. एवढेच काय केळगाव ग्रामपंचायत, आळंदी नगरपरिषदेचे सांडपाणीही इंद्रायणीत सोडले जात आहे.

इंद्रायणी पुन्हा फेसाळली: आळंदीत नागरिकांच्या आरोग्याला धोका, नदीला गटारीचे प्राप्त झाले स्वरूप

सांडपाण्यामुळे नदीपात्राला गटारीचे स्वरूप

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांश ठिकाणच्या नद्यांचे पाणी आटते. मात्र, आळंदीतील इंद्रायणीला विविध गावच्या सांडपाण्याचे वाहून येण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे नदी बारमाही वाहत असल्याचे चित्र आहे.  सध्या आळंदीतील इंद्रायणीत कोठेही जा सांडपाण्यामुळे नदीपात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठिकठिकाणी काळपट रंगाचे पाणी वाहताना दिसते. याचबरोबर जलपर्णीही मोठ्या प्रमाणात आहे.

Web Title: Tow school girls death because polluted water in solapur marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur News
  • Water problem

संबंधित बातम्या

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त
1

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त

Solapur News: माध्यमिक शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय; एका दिवसात 210 शाळांना मंजुरी आदेश
2

Solapur News: माध्यमिक शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय; एका दिवसात 210 शाळांना मंजुरी आदेश

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही
3

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही

Jyoti Waghmare : पूर आलेल्या गावात गेल्या शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे; जिल्हाधिकाऱ्यांनी झाप झाप झापलं
4

Jyoti Waghmare : पूर आलेल्या गावात गेल्या शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे; जिल्हाधिकाऱ्यांनी झाप झाप झापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.