सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे दयनीय अवस्था झाली होती. शेतकऱ्यांची शेती आणि घर संसार हे पूर्णपणे वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात 82 गावांमध्ये 120 तात्परते निवारा केंद्र निर्माण केलेली आहेत.
सोलापूर जिल्ह्यात वाढीव टप्पा अनुदानासाठी सुमारे 300 शाळा पात्र ठरल्या होत्या तर बारा शाळांनी पहिल्यांदा 20 टक्के टप्पा अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते.
गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे सभासदांना दर वर्षी मिळणारी 50 किलो साखर देता आली नाही. मात्र, यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम सभासदांना साखर देण्यात येईल.
Jyoti Waghmare VS Solapur Collector : सोलापूरमध्ये अति मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे याची पाहणी करायला आलेल्या ज्योती वाघमारे यांची सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वाद झाले.
महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये खूप पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने दोघांनी आत्महत्या केली.
राज्यात १०० दिवस कार्यक्रमअंतर्गत अनुकंपा पदभरती पारदर्शकपण राबवण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेने यात आघाडी घेत सर्व अनुकंपाअंतर्गत १०० टक्के जागा भरून उत्कृष्ठ काम केले आहे.
सीईओ कुलदीप जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत अनुकंपा भरती करण्यात आली. गेल्या महिन्यात १४४ अनुकंपा भरती करण्यात आली होती. सीईओ जंगम यांच्या धाडसी सकारात्मक निर्णयामुळे ते लोकप्रिय ठरत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.24) नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी सोलापूर दौरा करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रामध्ये अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हाता तोंडाला आलेले पीक वाहून गेले आहे. संपूर्ण जमीन पाण्याखाली वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यामध्ये ओला दुष्काळ…
महाराष्ट्रामध्ये अति पावसामुळे ओला दुष्काळ पडला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमधील गावांना भेटी देत सरकारला मदतीचे आवाहन केले.
मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, कधी नव्हे ते रौद्ररूप नदीने धारण केले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकलेले असून अतिरिक्त बचाव पथके मागवून बचाव कार्य अधिक गतिमान करण्यात येत आहे.
प्रशासकीय यंत्रणांनी नुकसानीचे पंचनामे अत्यंत गतिमान पद्धतीने व ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या ठिकाणचे १०० टक्के पंचनामे करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश दिले.
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूर विमानसेवेमध्ये महत्त्वपूर्ण सुविधा मिळणार आहे. सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार आहे.
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातून एक अतिशय धक्कदायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नातवाचा मृत्यू सहन न झाल्याने स्मशानभूमीतच आजीनेही आपला जीव सोडला आहे.
सोलापूर शहर कार्यकारिणी निवडीच्या निमित्ताने सोलापूर भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जुन्या निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून आलेल्यांनाच संधी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.