मुरुमाच्या खाणीत बुडून बालकाचा मृत्यू
मुरुड जंजिरा: औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) कन्नड तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचा काशीद येथील समुद्रात बुडून मृत्यू (Two Students Dead) झाला. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. औरंगाबाद जिल्ह्यातील साने गुरुजी माध्यमिक शाळेची इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल मुरूड (Murud) तालुक्यातील काशीद समुद्र किनारा (Kashid Beach) पाहण्यासाठी आली होती. यावेळी ८० विद्यार्थ्यांचा समूह काशीद समुद्र किनारी आला होता त्यावेळी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. प्रणव कदम आणि रोहन बेडवाल अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
[read_also content=”‘मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू’, उर्फी जावेदने साधला निशाणा-चित्रा वाघ यांनी दिलं ‘हे’ उत्तर https://www.navarashtra.com/maharashtra/chitra-wagh-replied-to-urfi-javeds-tweet-nrsr-360473.html”]
शाळेचे पाच विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. पोहता पोहता हे पाचही जण खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. मुले बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी लोकांनी पाण्यात उड्या टाकल्या. पाचपैकी तिघांना किनारी सुखरूप आण्यात आले. मात्र उर्वरित दोघे जण खोल पाण्यात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी एकाचा मृतदेह लगेच सापडला. तर दुसरा मुलगा सापडण्यात अडचण येत होती. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने काही तासानंतर त्याचा मृतदेह शोधून काढला.
प्रणव कदम आणि रोहन बेडवाल यांचे वय साधारण १५ वर्षापर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे मुरुड पोलिसांनी सांगितले. तर कृष्णा पाटील, तुषार वाघ व अन्य एकाला वाचवण्यात यश आले आहे. त्यांना बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.