Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha farmers suicide:दिवाळी ठरली काळरात्र! वर्धा जिल्ह्यात ऐन दिवाळीत १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतकऱ्यांनी पिके तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली, परंतु अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पीके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांनी महागडी औषधे खरेदी करून रोग आणि कीटकांपासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 27, 2025 | 04:01 PM
14 farmers commit suicide in Wardha district during Diwali

14 farmers commit suicide in Wardha district during Diwali

Follow Us
Close
Follow Us:
  • वर्धा जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
  • ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य
  • राज्य सरकारने मदतीचे आश्वासन देऊनही मदत नाही

Wardha farmers suicide: दिवाळीचा सण आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो. अलीकडच्या काळात देशातच नव्हे तर परदेशातही दिवाळीचा सण साजरा होऊ लागला आहे. पण याच दिवाळीला गालबोट लागले आहे. यंदाची दिवाळी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काळरात्र ठरली. गेल्या महिनाभरात विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. अतिवृ्ष्टीमुळे पिकांवर रोग आणि कीटकांच्या प्रादुर्भाव वाढला, उत्पादनात मोठी घट झाली. ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे उर्वरित उत्पादन बाजारात आणले त्यांना योग्य किंमत मिळाली नाही.

सर्व बाजूंनी आलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांना दु:खाचा डोंगर कोसळला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, ऐन दिवाळी शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखी टोकाची पावले उचलली. मिळालेल्या माहितीनुसार, १० ते २५ ऑक्टोबर या काळात एकट्या वर्धा जिल्ह्यात सुमारे १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्यात एका महिला शेतकऱ्याचाही समावेश आहे. महिला शेतकऱ्याचा मुलगा बँकेच्या कर्जामुळे त्रस्त होता, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत बुडाले होते.

US Navy: अपघात की घातपात! अमेरिकेच्या नौदलाचे विमान आणि हेलिकॉप्टरचा अपघात

कर्जाच्या या मानसिक तणावातून एका महिला शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. यावर्षी शेतकरी चांगल्या पिकाची आशा बाळगून होते. जिल्ह्यात सुमारे ४.३२ लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली, ज्यामध्ये २.२५ लाख हेक्टरवर कापूस आणि १.५ लाख हेक्टरवर सोयाबीनचा समावेश होता.

शेतकऱ्यांनी पिके तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली, परंतु अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पीके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांनी महागडी औषधे खरेदी करून रोग आणि कीटकांपासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वेळोवेळी मुसळधार पावसाने त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा खर्चही वसूल करणे कठीण झाले. दिवाळीपूर्वी पीक न आल्याने शेतकऱ्यांना त्यांचे धान्य बाजारात विकता आले नाही. र

दिवाळीनंतरही शेतकऱ्यांना मदत नाही; आत्महत्यांचे प्रमाण वाढतच

आर्थिक संकट, वाढते कर्ज, कुटुंबाचा सांभाळ, मुलांचे शिक्षण, आजार आणि मुलींचे लग्न यांसारख्या जबाबदाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या चिंता अधिकच वाढल्या आहेत. सरकारकडून मदत पॅकेज जाहीर करण्यात आले असले तरी, दिवाळीनंतरही ही मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेली नाही.

Satara Doctor Death Case: “महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा..; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन

अशा कठीण परिस्थितीत बँक आणि सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. आर्थिक निराशा आणि मानसिक तणावामुळे अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीसारख्या आनंदाच्या सणातही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. जर सरकार आणि प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर हे संकट आणखी तीव्र होईल.

शेतकरी संघटनांनी, बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, कर्जमाफीसारखे उपाय तातडीने राबवावेत, जेणेकरून शेतकरी पुन्हा स्वावलंबी बनू शकतील आणि अशा दुःखद घटना टाळता येतील.’ अशी मागणी केली आहे.

 

Web Title: Wardha farmers suicide 14 farmers commit suicide in wardha district during diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • Farmer Death
  • Farmers News

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कमी खर्च, जास्त नफा; सरकारच्या मदतीने ‘या’ पिकाने शेतकऱ्यांचे भाग्य उजळले
1

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कमी खर्च, जास्त नफा; सरकारच्या मदतीने ‘या’ पिकाने शेतकऱ्यांचे भाग्य उजळले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.