Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं; कारण देत म्हटलं…

राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानुसार, कोल्हापूरचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे गेलं आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे हा पदभार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2025 | 11:42 AM
हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं; कारण देत म्हटलं...

हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं; कारण देत म्हटलं...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मंगळवारी (दि.4) द्यावा लागला होता. तर दुसरीकडे, पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरुच आहे. असे असताना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं आहे. याचं कारणही त्यांनी दिलं आहे.

राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानुसार, कोल्हापूरचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे गेलं आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे हा पदभार आहे. त्यामुळे आबिटकरांच्या निवडीवर मुश्रीफांची नव्हे, तर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचीही नाराजी लपून राहिली नाही. हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरपासून थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. 26 जानेवारीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुश्रीफ वाशिमला पोहोचले. मात्र, शासकीय ध्वजरोहणाचा कार्यक्रम पार पडताच कोणतीही बैठक न घेता त्यांनी थेट पुन्हा कोल्हापूर गाठलं होतं.

वाशिम जिल्हाला लागलेला ‘झेंडा टू झेंडा’ पालकमंत्री हा डाग पुसू आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा दिली जाईल, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले होते. मात्र, त्यांची घोषणा फक्त घोषणाच राहिली आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराजी

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी संधी न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांची नाराजीही लपून राहिलेली नाही. 26 जानेवारीला ध्वजारोहण करून आल्यानंतर वाशिमकडे फिरकून परत न गेलेल्या हसन मुश्रीफ यांनी आता जबाबदारी सोडली आहे.

काय दिलंय राजीनाम्याचं कारण?

मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्याने 800 किमीचा प्रवास करणं शक्य नसल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्रिपद सोडल्याची माहिती सध्या दिली जात आहे. त्यामुळे आता वाशिम जिल्ह्याला लवकरच नवीन पालकमंत्री मिळणार आहे. सध्यातरी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवला जाणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Hasan mushrif resigned from post of guardian minister of washim nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
4

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.