Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

३०० चित्रपट, ५ लग्ने; हीरोलाही हरवणारा हा शक्तिशाली विलन शेवटच्या क्षणी झाला एकटा, मृतदेह ३ दिवस पडून राहिला

पाच विवाह आणि १२ प्रेमसंबंध असूनही त्यांना कधीच स्थैर्य वा खरी साथ मिळाली नाही. आयुष्याच्या शेवटी ते पूर्णपणे एकटे पडले

  • By अमृता यादव
Updated On: Nov 11, 2025 | 05:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

हिंदी चित्रपटसृष्टीत ८० आणि ९० च्या दशकात दमदार उपस्थिती दर्शवणारे महेश आनंद हे नाव एकेकाळी अ‍ॅक्शन आणि खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या उंच बांध्यामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्याकडे एका नायकाची शारीरिक क्षमता होती, परंतु त्यांना क्वचितच नायकाच्या भूमिकांमध्ये संधी मिळाली. बहुतांश चित्रपटांमध्ये ते निर्दयी खलनायक किंवा पार्श्वभूमी नर्तक म्हणून झळकले.महेश आनंद यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयात जोश, स्टाईल आणि प्रभाव होता, परंतु वैयक्तिक आयुष्य मात्र अत्यंत क्लेशकारक ठरले. त्यांनी पाच विवाह केले होते आणि अनेक प्रेमसंबंधांमध्येही अडकले, परंतु त्यांना खरे प्रेम किंवा स्थैर्य कधीच लाभले नाही.

शेवटच्या काळात ते पूर्णपणे एकटे झाले होते. २०१९ मध्ये त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली तेव्हा संपूर्ण उद्योग हादरला — कारण त्यांचा मृतदेह त्यांच्या घरात तीन दिवस पडून कुजत होता. जेव्हा शेजाऱ्यांना दुर्गंधी जाणवली तेव्हा पोलिसांना कळविण्यात आले आणि त्यांनी घरात प्रवेश केला.महेश आनंद यांनी १९८२ मध्ये “सनम तेरी कसम” या चित्रपटातून नर्तक म्हणून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. पुढे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि स्क्रीन प्रेझेन्समुळे त्यांना मोठ्या नायकांसोबत महत्त्वाच्या भूमिका मिळाल्या. त्यांनी अमिताभ बच्चन, रजनीकांत, कमल हासन, सलमान खान, विनोद खन्ना आणि मोहनलाल यांसारख्या दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर केली.

दक्षिण चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपली छाप सोडली  “वीरा” मध्ये रजनीकांतसोबत, “पेरिया मारुधू” मध्ये विजयकांतसोबत आणि “शिवशक्ती” मध्ये सत्यराजसोबत काम करत त्यांनी स्वतःला एक क्रूर, परंतु आकर्षक खलनायक म्हणून सिद्ध केले. प्रेक्षकांना त्यांचा द्वेष करायला आवडायचा आणि हाच त्यांच्या अभिनयाचा प्रभाव होता.महेश आनंद यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या पडद्यावरील भूमिकांइतकेच नाट्यमय आणि दुःखद होते. पाच विवाह आणि १२ प्रेमसंबंध असूनही त्यांना कधीच स्थैर्य वा खरी साथ मिळाली नाही. आयुष्याच्या शेवटी ते पूर्णपणे एकटे पडले.

८० कोटींचा हिरो, अपयशी खलनायक; बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला चित्रपट आता OTTवर ट्रेंडिंग

त्यांचे पहिले लग्न बरखा रॉय यांच्याशी झाले होते, परंतु हे नाते काही महिनेच टिकले. त्यानंतर त्यांनी माजी मिस इंडिया मारिका डिसूझा यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा झाला, पण मुलाच्या जन्मानंतर हे लग्नही तुटले.

१९९२ मध्ये त्यांनी मधु मल्होत्रा यांच्याशी तिसरे लग्न केले, पण त्यांच्यासोबत ही घटस्फोट झाला. यानंतर त्यांच्या आयुष्यात उषा बच्चन आली. काही काळाच्या डेटिंगनंतर त्यांनी एका खाजगी समारंभात लग्न केले, परंतु हे नाते फक्त दोन वर्षेच टिकले.

‘ऊत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर

शेवटी, महेश आनंद यांनी लाना नावाच्या रशियन महिलेशी विवाह केला, पण हे नातेही फार काळ टिकू शकले नाही. प्रत्येक वेळी त्यांनी प्रेमावर विश्वास ठेवला, पण प्रत्येक वेळी त्यांच्या आयुष्यात हृदयभंग आणि एकटेपणाचे सावट आले.

Web Title: Amitabh bachchan co star dreadly villain mahesh anand tragic life story forgotten star vanished from industry painful death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Bollywood News
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

‘अजून चेहरा रिव्हिल केला नाही, आणि…’, भारती सिंगचा मुलगा काजूचा Ai Photo व्हायरल, संतापली कॉमेडियन
1

‘अजून चेहरा रिव्हिल केला नाही, आणि…’, भारती सिंगचा मुलगा काजूचा Ai Photo व्हायरल, संतापली कॉमेडियन

‘Golmaal 5’ साठी स्टारकास्ट फायनल? अजय देवगणसह 5 स्टार्स करणार धमाल, पहिल्यांदाच होणार खलनायिकेची एन्ट्री
2

‘Golmaal 5’ साठी स्टारकास्ट फायनल? अजय देवगणसह 5 स्टार्स करणार धमाल, पहिल्यांदाच होणार खलनायिकेची एन्ट्री

‘हा’ बॉलीवूड सुपरस्टार नवा डॉन, Ranveer Singhचा पत्ता कट, Don 3 चित्रपटाबद्दल मोठी अपडेट
3

‘हा’ बॉलीवूड सुपरस्टार नवा डॉन, Ranveer Singhचा पत्ता कट, Don 3 चित्रपटाबद्दल मोठी अपडेट

“मी तयार आहे”, मलायका अरोरा करणार दुसरं लग्न? अरबाज खाननंतर अभिनेत्रीचा दुसऱ्या विवाहावर खुलासा
4

“मी तयार आहे”, मलायका अरोरा करणार दुसरं लग्न? अरबाज खाननंतर अभिनेत्रीचा दुसऱ्या विवाहावर खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.