Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सलमान खानचे ट्विट; नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर भाईजानने केले ‘हे’ कृत्य

अभिनेता सलमान खानने भारत पाकिस्तान युद्धबंदीवर ट्विट केले तेव्हा लोकांनी त्याला ट्रोल करण्यात सुरुवात केली. पहलगाम दहशतवादी हल्लानंतर भाईजानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आणि ती देखील आता अभिनेत्याने डिलीट केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 11, 2025 | 11:12 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सलमान खानला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराबद्दल त्यांनी दिलासा व्यक्त करणारे ट्विट केले. आणि अभिनेत्याचे ट्विट पाहून चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे. पण नंतर त्याने हे ट्विट डिलीट केले. सलमानने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “देवाचे आभार, युद्धबंदी झाली…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने २२ एप्रिल रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. दोन्ही बाजूंकडून सतत होणारा गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ले थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी शनिवारी संध्याकाळी युद्धबंदीची घोषणा केली.

युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर सलमान खानने ट्विट केले आणि नंतर अभिनेत्याने ते डिलीट केले. युद्धबंदीवर भाष्य केल्याबद्दल अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्यावर टीका केली. कारण याआधी सलमानने दहशतवादी हल्ला, भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरावर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर एकही शब्द बोलला नव्हता. अभिनेत्याने याबद्दल सार्वजनिकरित्या कोणतेही विधान केले नाही किंवा सोशल मीडियावर काहीही पोस्ट केले नाही. आणि आता अभिनेत्याने त्याची प्रतिक्रिया दिल्यानंतर आता तो ट्रोल झाला आहे.

Operation Sindoor नंतर हर्षवर्धन राणेने घेतला मोठा निर्णय; ‘सनम तेरी कसम’च्या सीक्वलबाबत दिले अपडेट!

अनेक वापरकर्त्यांनी सलमान खानवर भारतीय सैनिक आणि दहशतवादाच्या बळींच्या बलिदानाकडे आणि शौर्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. एका वापरकर्त्याने असेही लिहिले की सलमानला भारताच्या वेदनांबद्दल बोलण्यापेक्षा पाकिस्तानच्या कल्याणाची जास्त काळजी वाटत होती. गोंधळ इतका वाढला की सलमानने अखेर ट्विट डिलीट केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सलमान खानने प्रतिक्रिया दिली नाही
तथापि, सलमान खानच्या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सलमान खानने या प्रकरणावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही, किंवा त्याने कोणतेही नवीन ट्विट केलेले नाही. एका वापरकर्त्याने लिहिले, “सलमान खानने त्याचे ट्विट डिलीट केले, पहलगामवर काहीही पोस्ट केले नाही. भारतावरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान शाहरुख खान आणि आमिर खान देखील गप्प राहिले.”

पहलगाम हल्ल्यानंतर २२ दिवसांनी बिग बींनी सोडले मौन; नेटकरी थक्क, म्हणाले- ‘दबावात येऊन लिहिले…’

सलमान खानवर बहिष्कार टाकण्याची मागणी
दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, “भारताने सलमान खानवर बहिष्कार टाकावा.” एका वापरकर्त्याने लिहिले, “जर पाकिस्तानमध्ये स्फोट झाला असता, तर त्यांनी असे म्हटले असते का की भारताने ते केले – सलमान खानने २६/११ रोजी हे ट्विट केले होते आणि नंतर ते डिलीट केले होते. पहलगामवर एकही ट्विट नाही. भारतावरील दहशतवादी हल्ल्यावर शाहरुख खान, आमिर खान – गप्प राहिले. नेहमी लक्षात ठेवा – फाईट बॅक इंडिया.”

Web Title: Salman khan reaction on india pakistan ceasefire people reacts why not speak on pahalgam terror attack operation post deletes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • Bollywood
  • pahalgam attack
  • Salman Khan

संबंधित बातम्या

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन
1

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज होणार; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ
2

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज होणार; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात
3

Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा
4

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.