
जैत रे जैत सिनेमा आणि आशा भोसले हे एकेकाळी एक संगीतसृष्टीतलं समीकरण झालं होतं. स्मिता पाटील यांच्या अभिनयाने अजरामर झाालेल्या या सिनेमातील गाण्यांनी चार चाँद लावले. तुम्हाला माहितेय का या सिनेमाच्या रेकॉर्डींग वेळी एक किस्सा घडला होता.
सिनेमातल्या सगळ्याच गाण्याचं संगीत हृदयनाथ मंगेशकरांनी दिलं. मी रात टाकली या गाण्याचं रेकॉर्डींग होतं त्यावेळी एक किस्सा घडला होता. या गाण्यात एकाकीपणा, वेदना आणि जंगलातील शांतता ऐकू यायला हवी होती. पण स्टुडिओमध्ये गाणं गाताना तो फील येत नव्हता. काही केल्या हृदयनाथ मंगेशकरांना पाहिजे तसं गाणं होत नव्हतं. मग त्यांना एक वेगळी कल्पना सुचली. रेकॉर्डिंगच्या वेळी स्टुडिओतील लाईट्स कमी करण्यात आले, वातावरण शांत केलं आणि आशा ताईंना सांगितलं की, “तुम्ही स्वतःला एकटं समजा… जसं काही अंधारात बसून गात आहात. आणि मंगेशकरांनी गाण्यात जे हवं ते आशाबाईंच्या गळ्यातून उतरलं. मी रात टाकली म्हणणारी चिंगी समाजाच्या रुढी परंपरांविरोधात बंड पुकारणारी आदिवासी स्त्री.
तिला साजेसा असा रांगडेपणी पण त्यातही दु:ख, वेदना आणि समाजाबाबचा राग व्यक्त होतं अपेक्षित होतं ते शिवधनुष्य आशाबाईंनी चोख पार पाडलं. मंगेशकर आशाबाईंना कायम सांगत असे गाणं सुंदर गाऊ नका… खरं गा. आणि आशाबाईंनी संगीतकार म्हणून मंगेशकरांचं ऐकलं देखील. जैत रे जैत सिनेमा जसा मोहन आगाशे आणि स्मिता पाटील यांच्या अभिनयाने अजरामर झाला त्याच तोडीसतोड ना.धो. महानोरांचे शब्द, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि आशा भोसलेंचा जादुई आवाज याला देखील सिनेमाच्या यशाचं श्रेय जातं. आज आशा भोसले हे जग सोडून गेल्या तरी त्य़ांची गाणी काय़मच प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार आहेत.