Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजघाट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन; दारासिंग खुराणा यांच्या हस्ते पार पडला सोहळा

राजघाट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुळात, या सोहळ्याचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेते दारासिंग खुराणा यांच्या हस्ते पार पडला आहे. तसेच त्यांनी लोकांचे संबोधन केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 25, 2025 | 05:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त भव्य समारंभाचे आयोजन राजघाट येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध समाजसेवी आणि अभिनेते दारासिंग खुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन व पुष्पचक्र अर्पण करून नेताजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. उद्घाटनप्रसंगी खुराणा म्हणाले, “नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशभक्तीचे प्रतीक होते. त्यांचे धैर्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे तत्त्वज्ञान आजच्या तरुणांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करणे आणि त्यांचे बलिदान स्मरण करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”

‘स्त्री कशासाठी…?’, ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवण्यावरून किन्नर आखाड्यात सुरू झाला राडा

या कार्यक्रमाला ९ राज्यांतील ११४ शिक्षक, मान्यवर, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, विद्यार्थी, आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजघाटच्या संचालक ज्वाला प्रसाद यांनी देखील उपस्थित राहून नेताजींना श्रद्धांजली अर्पण केली. नेताजींच्या ऐतिहासिक वाक्याचा उल्लेख करताना “तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन,” उपस्थितांचे मन भरून आले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणे सादर केली. या कार्यक्रमात नेताजींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांना प्रभावीरीत्या साकारण्यात आले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील नेताजींची धैर्यशीलता, नेतृत्व क्षमता आणि त्यांच्या संघर्षमय प्रवासाला प्रभावीपणे सादर केले. त्यांच्या ऐतिहासिक भाषणांचे नाट्यरूपांतर आणि आझाद हिंद फौजेमधील महत्त्वाच्या प्रसंगांना मूर्त स्वरूप दिले. या सादरीकरणांनी उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आणि प्रत्येकामध्ये देशभक्तीचा भाव जागवला.

इतिहासकार आणि तज्ज्ञांनी या कार्यक्रमात नेताजींच्या भारतीय राष्ट्रीय सैन्यातील योगदानावर सखोल चर्चा केली. त्यांनी नेताजींच्या कार्याचे महत्त्व विषद करताना आझाद हिंद फौजेमुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला मिळालेली प्रेरणा आणि त्यांच्या दूरदर्शी विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. नेताजींच्या झुंजार व्यक्तिमत्त्वावर त्यांनी प्रकाश टाकला आणि त्यांच्या कार्यातून मिळणाऱ्या प्रेरणांची चर्चा केली. यामुळे उपस्थितांना नेताजींच्या जीवनाचे आणि त्यागाचे महत्त्व समजले.

कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी अभिनेते दारासिंग खुराणा यांनी तरुण पिढीला नेताजींच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “नेताजींचा आत्मविश्वास, स्वावलंबन आणि धैर्याचे तत्त्वज्ञान प्रत्येक तरुणाने आत्मसात करायला हवे. त्यांच्या विचारांवर चालल्यास आपण आपल्या देशाला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकतो.” त्यांच्या या प्रभावी भाषणामुळे तरुण पिढीमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारली.

अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अमिताभ बच्चन पुन्हा दिसणार एकत्र; करणार या आगामी प्रोजेक्टमध्ये काम!

कार्यक्रमाचा समारोप नेताजींच्या आदर्शांचे पालन करण्याची प्रतिज्ञा घेत आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करत करण्यात आला. सूर्यास्त होत असताना राजघाट देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरून गेले होते. उपस्थित प्रत्येकाला नेताजींच्या बलिदानाची जाणीव झाली आणि त्यांचे जीवन देशासाठी प्रेरणादायी वाटले. त्यांच्या देशभक्तीने प्रेरित होऊन सर्वांनी देशसेवेसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. या भव्य आयोजनामुळे नेताजींच्या विचारांचे पुन्हा स्मरण झाले. त्यांच्या ध्येयाने उपस्थितांमध्ये नवीन देशप्रेम जागृत केले. नेताजींच्या जीवनाचा प्रभाव या कार्यक्रमाद्वारे प्रत्येकाच्या मनात ठसला आणि त्यांच्या प्रेरणेने राष्ट्रनिर्माणासाठी नवा उत्साह दिला.

Web Title: Netaji subhash chandra boses birth anniversary celebrations inaugurated at rajghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • Netaji Subhash Chandra Bose

संबंधित बातम्या

Female Spy Neera Arya :आज़ाद हिंद फौजची पहिली महिला गुप्तहेर; कोण आहेत नीरा आर्य
1

Female Spy Neera Arya :आज़ाद हिंद फौजची पहिली महिला गुप्तहेर; कोण आहेत नीरा आर्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.