हळद : हळद जंतू नाशक असून आयुर्देवात हळदीला मोठं महत्त्व आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हळदीचं सेवन गुणकारी ठरतं. रोज सकाळी हळदीचं दूध प्यायल्यास अनेक आजार दूर होतात.
लवंग :पावसाळ्यात तापाची साथ मोठ्या प्रमाणात वाढते. ताप खूप जास्त येत असल्यास लवंगाचा काढा करुन प्यायल्यास काही तासातच ताप उतरतो. लवंगामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीव्हायरल आणि अँटी-मायक्रोबियल मोठ्या प्रमाणात असतात.
जीरं: अनेकदा पावसाळ्यात पचनसंस्था बिघडते. पोटाच्या वारंवार तक्रारी जाणवतात. त्यामुळे जेवणानंतर जीरं खाणं किंवा सकाळी जीऱ्याचं पाणी पिण्यानं पोटाचं आरोग्य सुधारतं.
काळी मिरी : काळी मिरी शरीरात उष्णता निर्माण करते. पावसाळ्यात बाहेरील वातावरणात अतिरिक्त थंडावा असतो. त्यामुळे शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास काळ्या मिरीचा काढा योग्य प्रमाणात घेणं फायदेशीर आहे.
आलं : जेवणात आल्याचा समावेश असणं. आल्याचा रस किंवा आल्याचा चहा प्य़ायल्याने सर्दी आण खोकला कमी होण्यास मदत होते.