अर्ध शरीर स्त्रीचं, अर्ध सापाचं... कोण होती ती मुलगी जिच्या मृत्यूनंतर साप मनुष्याचे शत्रू बनले?
ही कथा तुर्कीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. कथेची सुरुवात कॅमसब नावाच्या एका तरुणापासून होते जो आपल्या मित्रांसोबत मध गोळा करण्यासाठी एका गुहेत गेलेला असतो पण त्याचे मित्र त्याला इथे सोडून निघून जातात ज्यांनंतर त्याला इथे शाहमरान भेटते. ती फार सुंदर, दयाळू आणि बुद्धिमान असते. ती कॅमसबला सापांच्या या राज्यात राहण्यासाठी सुरक्षित आश्रय देते
कथेत पुढे शाहमरान आणि कॅमसब प्रेमात पडतात पण कैमसबला आपल्या जगात पुन्हा परतायचे असते ज्यासाठी सापांची राणी त्याला परवानगी देते पण तिच्या काही अटी असतात जसे की तिचे रहस्य त्याने कुणालाही बाहेर सांगू नये आणि कधीही पाण्यात आंघोळ करू नये कारण त्याचे असे केले तर त्याच्या शरीरावर सापाचे खवले दिसू लागतील. कैमसब या सर्व अटी स्वीकारतो आणि त्याच्या जगात पुन्हा परततो.
तथापि राजा आजरी पडतो आणि राजाच्या मंत्र्याला हे कळते की जर राजाला शाहमरानचे मांस खायला दिले तर त्याचा आजार बारा होऊ शकतो. आता इतक्या मोठ्या लोकसंख्येत कोण शाहमरान ओळखतो हे जाणून घेण्यासाठी सर्वांना आंघोळ घालण्याचे निश्चित होते. अशा परिस्थितीत जेव्हा अशा परिस्थितीत, जेव्हा कॅमसबला आंघोळ घातली जाते तेव्हा त्याची ओळख पटते आणि इच्छा नसतानाही त्याला सर्वकाही सांगावं लागतं
अखेर कॅमसबकडून माहिती मिळताच शाहमरनला पकडून तिला मारले जाते. पण मारण्यापूर्वी शाहमरनला कॅमसबला तिचे शरीर तीन भागात विभागण्याचा सल्ला देते. पहिल्या भागात विष असते, दुसऱ्या भागात बुद्धिमत्ता आणि तिसऱ्या भागात उपचार असतात. कॅमसब असंच करतो आणि पहिला भाग मंत्र्याला देतो, तिसरा भाग राजाला जातो, जो खाल्ल्यानंतर तो निरोगी होतो आणि दुसरा भाग कॅमसबला मिळतो ज्याने त्याला शाहमरनची बुद्धिमत्ता मिळते
कथांचे ऐकले तर येथूनच साप आणि मानवांमधील शत्रुत्व वाढले. शाहमरनच्या मृत्यूनंतर सापांनी मानवांचा द्वेष करण्यास सुरुवात केली. तुर्की लोककथांमध्ये असे मानले जाते की शाहमरनच्या काळात साप आणि मानव एकाच वेळी एकत्र राहत होते.