Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Elections 2025: दिल्ली आणि बिहार, दोन्ही राज्यांमध्ये भाजप नेत्याचे मतदान; आप’चा आरोप, नेमक काय आहे प्रकरण?

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर ६४.६९% मतदान झाले. हे राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान आहे, जे १९५१ पासूनचे सर्व विक्रम मागे टाकले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 07, 2025 | 02:59 PM
Bihar Elections 2025: दिल्ली आणि बिहार, दोन्ही राज्यांमध्ये भाजप नेत्याचे मतदान; आप’चा आरोप, नेमक काय आहे प्रकरण?
Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी पहिल्या टप्प्यातील मतदान
  • काही भाजप नेत्यांचे दिल्ली आणि बिहार दोन्ही राज्यात मतदान
  • भाजपने मतदारांची पद्धतशीर ओळखपत्र तयार करून त्यांना बिहारला पाठवले
Bihar Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी (६ नोव्हेंबर) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेनंतर आज आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. एका भाजप नेत्याने दिल्ली आणि बिहार या दोन्ही ठिकाणी मतदान केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या काही भाजप नेत्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातही मतदान केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे. पण, भाजपने आपचा हा दावा फेटाळून लावत ‘आप’ निवडणुकीतील पराभवाच्या निराशेतून खोटी माहिती पसरवत असल्याचा पलटवार केला आहे.

Bihar Elections 2025: बिहारच्या मोकामामध्ये मतदानावेळी उफाळला हिंसाचार; याचठिकाणी झाला होता दुलारचंदचा हत्याकांड

काय म्हणाले सौरभ भारद्वाज

पत्रकार परिषदेत सौरभ भारद्वाज म्हणाले की, भाजपचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा आणि दिल्ली भाजप पूर्वांचल मोर्चाचे अध्यक्ष संतोष ओझा यांसारख्या नेत्यांनी दोन्ही राज्यांमध्ये मतदान केले. निवडणूक आयोगाने डुप्लिकेट मतदार काढून टाकले असतानाही भाजप नेत्यांनी “मोठ्या प्रमाणात मतदारांची फसवणूक” केली आहे. भाजपने लोकशाहीची थट्टा केली आहे आणि निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आप नेत्याने त्यांच्या ट्विटर एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भाजपने मतदारांची पद्धतशीर ओळखपत्र तयार करून त्यांना बिहारला पाठवल्याचा आरोप केला आहे भाजपचे करनाल भाजपचे करनाल जिल्हाध्यक्ष स्टेशनवर उपस्थित होते आणि भाजपने रेल्वे तिकिटे आणि प्रवासाची व्यवस्था केली. यामुळे बिहारमधील मतदारांची संख्या गेल्या ७५ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली. भाजपने निवडणूक निकाल आपल्या बाजूने वळवण्यासाठी ही सुनियोजित योजना आखली असल्याच आरोपही सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

Bihar elections: तेजस्वी यादवने बजावला मतदानाचा हक्क

भाजप नेत्यांनी जरांगे प्रकरणातील आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. भाजप खासदार राकेश सिन्हा म्हणाले, “त्यांचे नाव दिल्ली मतदार यादीतून वगळून बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील मानसेरपूर गावात नोंद करण्यात आले आहे. संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी असे वक्तव्य करण्यापूर्वी दोनदा विचार करावा,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच भाजप नेते संतोष ओझा म्हणाले, “बक्सर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीसाठी त्यांनी आधीच बिहारच्या मतदार यादीत नाव नोंदवले आहे. दिल्लीतील पराभवामुळे निराश झालेल्या ‘आप’ नेत्यांनी भाजपला बदनाम करण्यासाठी खोटेपणा पसरवण्याचा प्रयत्न केला आहे,” असा आरोप ओझा यांनी केला.

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर ६४.६९% मतदान झाले. हे राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान आहे, जे १९५१ पासूनचे सर्व विक्रम मागे टाकले आहेत. अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली. “बिहारने संपूर्ण देशाला मार्ग दाखवला आहे. १९५१ नंतरचा हा सर्वाधिक मतदानाचा टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपा के @RakeshSinha01 , @santoshojha के विषय में @BJP4India अपनी बात रखें और लाखों लोग जिन्हें भाजपा ने बिहार में वोट डालने भेजा है उनपर भाजपा का क्या कहना है ? pic.twitter.com/skDA0UxbRO — Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) November 7, 2025

Web Title: Bjp leader votes in both delhi and bihar aap alleges what is the real issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • aam adami party
  • Bihar Elections 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.