Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : भाजपात ‘तात्पुरत्या कार्यकर्त्यांचा’ भरणा; संघटन बळकट की केवळ दिखाऊ विस्तार?

राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेमध्ये असलेला भाजप पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व इच्छुक जोरदार तयारीला लागत आहेत. मात्र भाजपची सध्याची राजनीती काहीतरी वेगळी आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 19, 2025 | 05:13 PM
For the local body elections, the BJP party has a large number of aspiring candidates

For the local body elections, the BJP party has a large number of aspiring candidates

Follow Us
Close
Follow Us:

BJP Politics : नांदेड : भारतीय जनता पक्षात सध्या एक वेगळीच कार्यपद्धती रुजताना दिसत आहे. भाषणांमध्ये विचारधारा, निष्ठा आणि संघटनात्मक शिस्त यांचे गोडवे गायले जात असले, तरी प्रत्यक्ष राजकारणात मात्र सध्या कोण उपयुक्त? हा एकच निकष प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. याच प्रवृत्तीतून पक्षात ‘प्रासंगिक कार्यकर्ता’ हा नवा प्रकार पुढे आला असून, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणारे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाले आहेत.

नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अधिक ठळक झाली आहे. निवडणूक व्यवस्थापनाची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत, त्यांच्या भोवती अचानक गर्दी वाढली आहे. कालपर्यंत पक्षाशी फारसा संबंध नसलेली मंडळी आज भाजपाची टोपी घालून उमेदवारीसाठी विविध क्लृप्त्या लढवत आहेत. तिकीट मिळवणे हेच अंतिम ध्येय ठेऊन आलेली ही ‘कराराधारित निष्ठा’ पक्षात चर्चेचा विषय ठरली आहे

हे देखील वाचा : महिलांचा अपमान थांबणार कधी? नीतीश कुमारांच्या हिजाब ओढण्याने दुखावली डॉक्टर, थेट सोडला बिहार

सध्याच्या परिस्थितीत पक्षात तीन स्पष्ट प्रवाह दिसतात. एकीकडे सत्ता नसतानाही गल्लोगल्ली फिरत संघटन उभे करणारा जुना कार्यकर्ता. दुसरीकडे राजकीय हवामान पाहून भूमिका बदलणारा गट. आणि तिसरा निवडणुकीच्या काळात सक्रिय, अन्य वेळी अलिप्त राहणारा’ वेळेपुरता कार्यकर्ता’. विशेष बाब म्हणजे सध्या तिसऱ्या प्रवाहालाच सर्वाधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना पक्षांतर्गत पसरली आहे. पूर्वी काँग्रेसच्या दबावाला तोंड देत, अपमान सहन करत पक्षाची धुरा वाहणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आज वेळ नाही, अशी कुजबुज आहे.

उलटपक्षी, अलीकडेच प्रवेश केलेल्या नेत्यांसाठी दरवाजे सहज उघडले जात आहेत. त्यामुळे अनुभव आणि निष्ठेपेक्षा “सध्याची उपयुक्तता” अधिक महत्त्वाची ठरू लागल्याचे दिसते. यामुळे अनेक जुने कार्यकर्ते स्वतःलाच प्रश्न -विचारू लागले आहेत आपण पक्षासाठी आहोत की केवळ भूतकाळाचा भाग? असा सवाल केला जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासोबत भाजपात आलेल्या काही गटांचा म आत्मविश्वास शहरात ठळकपणे जाणवतो. त्यांच्या सभोवती फिरणाऱ्या इच्छुकांमध्ये उमेदवारी जवळपास ठरल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावरील फोटो, सततचे संपर्क आणि अफांचा बाजार, या माध्यमातून राजकीय वातावरण तापले असताना, तळागाळातील कार्यकर्ते मात्र संभ्रमात सापडले आहेत.

हे देखील वाचा : सात तासांची शोधमोहीम; आता मीरा भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत,हल्ल्यात सात जण जखमी

मुलाखतींचा विषय चिंतेचा

विशेष चिंतेची बाब म्हणजे उमेदवारांच्या मुलाखतीत विचारधारा आणि संघटनात्मक योगदानापेक्षा आर्थिक क्षमतेवर भर दिला जात असल्याची चर्चा आहे.’ प्रचारासाठी किती खर्च करू शकता? किवा पक्षाला किती आर्थिक मदत देणार? असे प्रश्न महत्वाचे ठरत असल्याने, वैचारिक बांधिलकी दुय्यम ठरत असल्याची भावना निष्ठावंतांमध्ये आहे. जर उमेदवारीचे निकष आधीच ठरले असतील, तर वारंवार मुलाखतीचा दिखावा कशासाठी, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या सगळ्या घडामोडीमुळे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. हा वाढता जनसंपर्क म्हणजे खरोखर संघटन मजबूत होत आहे की केवळ तात्पुरती फुगवटा निर्माण होत आहे? आज जे सोयीस्कर कार्यकर्ते आहेत, ते उद्या परिस्थिती बदलताच दुसऱ्या दिशेने वळणार नाहीत, याची हमी कोण देणार? असा सवाल कार्यकत्यांचा आहे. भाजपाची ही बदलती कार्यसंस्कृती पक्षाला निवडणुकीत लाभ देईल की दीर्घकालीन निष्ठेला तडा देईल? हा प्रश्न केवळ चर्वेपुरता मर्यादित राहिला नसून, संघटनाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरत आहे.

 

Web Title: Bjp party large number of aspiring candidates for the local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Local Body Election
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

वडगाव मावळमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला; अंदाज–तर्क वितर्कांना उधाण, ढोल–ताशा पथकांची तयारी
1

वडगाव मावळमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला; अंदाज–तर्क वितर्कांना उधाण, ढोल–ताशा पथकांची तयारी

सातारा नगरपरिषद निवडणूक होणार रद्द? उमेदवाराकडूनच निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
2

सातारा नगरपरिषद निवडणूक होणार रद्द? उमेदवाराकडूनच निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान! बारामतीचा चेहरामोहरा बदलणार, IIT, IIM आणणार; ‘फक्त राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना…’
3

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान! बारामतीचा चेहरामोहरा बदलणार, IIT, IIM आणणार; ‘फक्त राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना…’

‘मत संग्राम’ मनपाचा! नांदेड प्रशासन सज्ज; ८१ नगरसेवक रिंगणात, ५ लाख मतदार ठरवणार भविष्य
4

‘मत संग्राम’ मनपाचा! नांदेड प्रशासन सज्ज; ८१ नगरसेवक रिंगणात, ५ लाख मतदार ठरवणार भविष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.