Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भैय्याजी जोशींचे मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान; मुख्यमंत्री फडणवीसांनी विधीमंडळात मांडली भूमिका

Bhaiyaji Joshi's controversial statement RSSचे भैय्याजी जोशी यांनी मुंबईमध्ये मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिला आहेय

  • By प्रीति माने
Updated On: Mar 06, 2025 | 01:26 PM
CM Devendra Fadnavis reacts to RSS Bhaiyaji Joshi controversial Marathi statement

CM Devendra Fadnavis reacts to RSS Bhaiyaji Joshi controversial Marathi statement

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. नुकतेच राजधानी दिल्लीमध्ये अखिल मराठी साहित्य संमेलन देखील पार पडले. मात्र मराठी भाषेची महाराष्ट्रामध्येच गळचेपी होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते भैयाजी जोशी यांनी मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केले. यावरुन आता राजकारण रंगले आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये स्पष्टीकरण दिले आहे.

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन आक्रमक भूमिका घेतली खासदार राऊत म्हणाले की “भैय्याजी जोशी असं म्हणतात की, मुंबईत येऊन कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो. कारण मुंबईला कोणतीच भाषा नाही. त्यांचं म्हणण आहे की, घाटकोपरची भाषा गुजराती आहे. ते तामिळनाडूत जाऊन चेन्नईत असं बोलू शकतात का?. बंगळुरु, लुधियानाला, पाटण्याला, लखनऊला जाऊन हे .बोलू शकतात का? महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन सांगतात मुंबईची भाषा मराठी नाही, ती गुजराती आहे अन्य आहे. मराठी येण्याची गरज नाही, मराठी आमची राजभाषा आहे. राजभाषा असेल तर अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या प्रकरणावरुन विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस म्हणाले की, भैय्याजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. ते पूर्णपणे ऐकून, माहिती घेऊन मी बोलेन.पण सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची , महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्यात, त्या संदर्भात भय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि पुन्हा एकदा शासनाच्या वतीने सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषाही मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कोणत्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणूनच शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या प्रकरणावर भाजप आमदार राम कदम यांनी देखील प्रतिक्रिया देत भैय्याजी जोशी यांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले की, त्याग पुर्ण आणि समर्पित राष्ट्रासाठी जीवन जगणारे भैय्या जोशी यांच्या विधानाला तोडूमोडून वेगळ्या दिशेने दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्या बोलण्याचा अर्थ एकच आहे, घाटकोपरच्या एक विशिष्ठ भागात गुजरात भाषिक वर्ग राहतो त्यामुळे त्यांच्या संवादाची भाषा वेगळी. मुंबईतील भाषा काल ही मराठी होती आजही आहे, मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला गेला आहे,. जे अबु आझमीला स्वत: च्या मांडीवर बसून त्यांच्या आधारावर सरकार चालवत होते, ते आता आमच्यावर बोलणार आहेत, असे म्हणत राम कदम यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

Web Title: Cm devendra fadnavis reacts to rss bhaiyaji joshi controversial marathi statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 01:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.