Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Waqf Bill Amendment : मुंबईतील वक्फ बोर्डाच्या जमिनीचा व्यवहार आधीच झालेला..त्यासाठी विधेयक; राऊतांचा गंभीर आरोप

वक्फ सुधारित विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाले असून राज्यसभेमध्ये सादर केले जाणार आहे. मात्र त्यापूर्वी वक्फच्या जमिनींचा व्यवहार ठरला असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 03, 2025 | 01:09 PM
MP Sanjay Raut Targets Amit Shah Over Waqf Bill Amendment Mumbai Land Transactions

MP Sanjay Raut Targets Amit Shah Over Waqf Bill Amendment Mumbai Land Transactions

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वक्फ बोर्डवरुन देशभरामध्ये राजकारण रंगले आहे. वक्फ बोर्ड सुधारक विधेयक लोकसभेमध्ये पारित करण्यात आले आहे. रात्री उशीरा हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते पडली. यावरुन देशामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आज (दि.04) हे विधेयक राज्यसभेमध्ये मांडण्यात येणार आहे. याबाबत राज्यसभेमध्ये काय होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ठाकर गटाने वक्फ बोर्ड सुधारक विधेयकाला विरोध दर्शवला आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून अमित शाहांवर निशाणा साधला आहे.

हे मुस्लीमांच्या संपत्तीवर कब्जा करण्यासाठी

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. वक्फ बोर्ड सुधारक विधेयकांबद्दल उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मत मांडणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, आमची भूमिका उद्धव ठाकरे सविस्तरपणे मांडतील. पहाटेच्या सुमारास हे वक्फ विधेयक पास झालं. जसं काय देशामध्ये खूप मोठी क्रांती करत आहेत अशा प्रकारचा एक माहोल सरकारने तयार केला. बील मंजूर झालं आणि आमचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले. या बिलामुळे या देशामध्ये काय झालं? हा सगळा व्यवहार मुस्लीमांच्या संपत्तीवर कब्जा करण्यासाठी बनवण्यात आला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वक्फ बोर्ड विधेयक हे पूर्णपणे ढोंग

पुढे ते म्हणाले की, “वक्फ सुधारक विधेयक हा एक भ्रष्टाचार आहे. प्रत्येक गोष्टीवर हिंदू मुस्लीम करायचं. या देशाचा राष्ट्रीय खेळ पूर्वी हॉकी होता. त्यानंतर जय  शहा यांनी क्रिकेट खेळ करत राष्ट्रीय खेळ क्रिकेट केला. हिंदू विरुद्ध हिंदू आणि मुस्लीम विरुद्ध मुस्लीम असा नवीन धार्मिक खेळ त्यांनी सुरु केला आहे. हिंदू आणि मुस्लीम यांच्याविरोधातील हा नवा राष्ट्रीय खेळ या लोकांनी सुरु केला आहे. वक्फ विधेयकामधून फार मोठे असे महान कार्य आणि गरिब मुस्लीमांना मदत आणि त्यांचा उद्धार होणार आहे अशी भाषा जी काल केली. ते पूर्णपणे ढोंग आहे. अडीच लाख कोटींच्या वर ज्या प्रोपर्टीचे मुल्य केलेले आहे. अशा मालमत्तेवर आपला अधिकार रहावा यासाठी काल हा सगळा खेळ झाला. यामधून अल्पसंख्याक, मुस्लीम आणि त्यांच्या महिला यांचा उद्धार कसा होणार?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

शेवटी जमिनीच्या सौद्यावर आलेच

खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते व केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “काल अमित शाह यांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं. 2025 पर्यंतच्या मशिदी, मदरसे आणि दर्गे यांना ते हात लावणार नाहीत. पण रिक्त जमिनींची विक्री करु. त्या पैशातून आम्ही गरिब मुस्लीम महिलांना आम्ही दान देऊ. म्हणजे शेवटी ते खरेदी विक्रीवर आले आहेत. मोकळ्या जमिनींचा आम्ही सौदा करु हे नकळत सत्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडलं. या मोकळ्या जमिनीची किंमत 2 लाख कोटी रुपये आहे. जशी धारावीची जमीन आणि देशभरातील विमानतळे विकण्यात आली. वक्फच्या जमिनींचा व्यवहार आणि व्यापार करायचा आहे. या देशामध्ये विकणारे दोन आणि विकत घेणारे दोनच आहेत,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मुस्लीमांचं इतकं लांगूलचालन बॅरिस्टर जीनाने नाही केलं

खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील जमिनीवरुन देखील अमित शाहांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “या लोकांना ऑरिजनल शिवसेनेची दिवस रात्र आणि पहाटे भीती वाटत आहे. ही आता सुद्धा सांगतो. मुंबईतील वक्फ बोर्डचा व्यवहार हा आधीच ठरला आहे. या जमिनीच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरुप आणण्यासाठी हे विधेयक आणले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भीती मी समजू शकतो. आम्ही त्यांना उघड पाडणार आहोत. आणि पाडत आहोत. अमित शाह यांचं भाषण ऐकलं तर मुस्लीमांचं इतकं लांगूलचालन बॅरिस्टर जीना, औवीसी यांनी देखील केले नाही. इतक्या भयंकर पद्धतीने त्यांनी भाषण केलं. त्यांचं भाषण म्हणजे मुस्लीम लांगूलचालनाचा अतिउच्च नमुना होता,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

 

Web Title: Mp sanjay raut targets amit shah over waqf bill amendment mumbai land transactions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • MP Sanjay Raut
  • Waqf
  • Waqf Amendment Bill

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.