Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar News : अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नव्हती…; माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला दिला मोठा सल्ला

जेष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष वेधले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 23, 2025 | 12:07 PM
ncp sharad pawar live press on maharashtra monsoon and Wet drought political news

ncp sharad pawar live press on maharashtra monsoon and Wet drought political news

Follow Us
Close
Follow Us:

Sharad Pawar News : बारामती : राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. दुष्काळी भागामध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाला आलेले पीक जमीनदोस्त झाल्यामुळे त्यांचा जीव हैराण झाला आहे. दरम्यान, राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करुन मदत द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या संदर्भात जेष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला असून अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरले आहे. अशी परिस्थिती यापूर्वी पाहिली नव्हती असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार म्हणाले की, “दुष्काळासाठी प्रसिद्ध आणि जिथे पाऊस-पाण्याची कमतरता असते अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतक-यांच्या संसारांवर झालेला आहे. साधारणपणे या महिन्यांमध्ये सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सोयाबीन हे भरवश्याचं पीक असतं. मात्र, अतिवृष्टीमुळे सोयाबीनची वाढ झाल्यानंतर पाच दिवस वाफ्यामध्ये पाणी राहिलं आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर पिके कुजून गेली. त्यामुळे, त्यापासून 2025 येणारे उत्पादन शेतक-यांच्या हातात पडलेलं नाही”, असे मत शरद पवारांनी मांडले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

राज्य सरकारला देखील शरद पवारांनी आवाहन केले आहे. शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा असे देखील महायुती सरकारला सुचवले आहे. ते म्हणाले की, आपण दुष्काळ पाहिला पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कथी पाहिली नव्हती. नेहमी कमी पाऊस असणा-या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे. त्यात सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी अशा जिल्‌ह्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची असते. केंद्राकडे नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारने वेगाने पंचनामे करणं व नुकसान भरपाई देणं या दोन गोष्टी तातडीने करण आवश्यक आहे, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पीक वाहून गेलं तर त्या वर्षीचं नुकसान होतं. पण जमीन वाहून गेलीदितर त्या जमिनीची उत्पादकता कायमची कमी होते. त्यामुळे फक्त पिकांसाठी मदत करून चालणार नाही, जमिनीसाठीही मदत करावी लागेल. रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, अनेक ठिकाणी गुरे वाहून गेली. त्यामुळे शेतीसाठी समस्या निर्माण होतील. या सर्व गोष्टींकडे बघण्याची गरज आहे. हे काम राज्य सरकारला गतीनं करावं लागेल”, असे शरद पवारांनी नमूद केले आहे.

Web Title: Ncp sharad pawar live press on maharashtra monsoon and wet drought political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • Maharashtra Weather
  • political news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबरला मतदान; आज थंडावणार प्रचारतोफा
1

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबरला मतदान; आज थंडावणार प्रचारतोफा

‘काँग्रेसमध्ये गटबाजी नाही, जिल्ह्यात केवळ मुलाखतीच घेतल्या’; सपकाळांचा यू-टर्न
2

‘काँग्रेसमध्ये गटबाजी नाही, जिल्ह्यात केवळ मुलाखतीच घेतल्या’; सपकाळांचा यू-टर्न

Maharashtra Rain Alert: राज्याच्या दिशेने येतेय मोठे संकट; IMD ने दिला ‘हा’ इशारा
3

Maharashtra Rain Alert: राज्याच्या दिशेने येतेय मोठे संकट; IMD ने दिला ‘हा’ इशारा

Kankavli News: ठाकरे गट सत्ताधारी पक्षातील कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही; माजी आमदार वैभव नाईकांचे वक्तव्य
4

Kankavli News: ठाकरे गट सत्ताधारी पक्षातील कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही; माजी आमदार वैभव नाईकांचे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.