मुंबई : बॉलीवुडचा लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान याच्या हल्ला करण्यात आला. 16 जानेवारी रोजी रात्री 2 वाजता घरात घुसखोरी केलेल्या व्यक्तीने सैफ अली खानवर हल्ला केला. यामध्ये धारदार शस्त्राने हल्लेखोराने त्याच्यावर सहा वार केले. यामध्ये मोठा चाकूचा तुकडा सैफच्या शरिरामध्ये घुसला गेला. यानंतर सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पार पडली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, दोन दिवसांनंतर पोलिसांना हल्लेखोराला पकडण्यात यश आले आहे. मात्र हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यावरुन देशाच्या सीमा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबई पोलीसांनी सैफ अली खानवरील हल्ल्यावरुन जोरदार तपास सुरु केला होता. या याप्रकरणातील हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना यश आलं असून आज आरोपीला त्यांनी ठाणे येथून ताब्यात घेतलं. आरोपीला अटक केल्यावर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचं नाव, तसेच प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असावा असा संशय व्यक्त केला आहे. यामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. बांगलादेशी घुसखोर हे भारतातील लोकप्रिय अभिनेत्यांवर थेट हल्ला करत असल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना सवाल केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
शिवसेनेच्या (ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करुन घणाघात केला आहे. प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, “भारताच्या गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे की त्यांनी देशाच्या सीमा इतक्या नाजूक करून ठेवल्या आहेत की बांगलादेशी केवळ बेकायदेशीरपणे या सीमा ओलांडून भारतात प्रवेश करत नाहीत तर आपल्या देशात दहशत पसरवत आहेत, गुन्हे करत आहेत. त्यांना सीमा ओलांडून भारतात प्रवेश करण्यास कोण मदत करतंय? इथे येऊन त्यांना शासकीय कागदपत्रं मिळवणं, नोकऱ्या मिळवणं आणि भयंकर गुन्हे करणं इतकं सोपं कसं काय? इतक्या सहजपणे बांगलादेशी भारतात या कारवाया कसे काय करतायत? इतर नेत्यांना देशद्रोही म्हणण्याआधी केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की स्थलांतर व घुसखोरी थांबवण्यात त्यांचं हे अपयश देशद्रोहाचंच कृत्य आहे”, अशा कडक शब्दांत प्रियांका चतुर्वेदी यांनी टीका केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारही अनेक पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे. राज्यात बेकायदेशीरपणे येणाऱ्या स्थलांतरितांना शोधणे, त्यांची ओळख पटवून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य कारवाई करण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरलं आहे. डबल इंजिन सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलं आहे. गुप्तचर यंत्रणा व प्रशासनाचं हे मोठं अपयश आहे. ही घटना खूप लज्जास्पद आहे,” अशी टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे.