Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Murder : बीडला बिहारसारखं करायचं आहे का? मूक मोर्चामध्ये संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केला संताप

बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे विराट मूक मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये संभाजीराजे छत्रपती हे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 28, 2024 | 01:04 PM
Sambhajiraje Chhatrapati press participation of Swarajya Party in local body elections

Sambhajiraje Chhatrapati press participation of Swarajya Party in local body elections

Follow Us
Close
Follow Us:

बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरण व परभणी प्रकरणावरुन जोरदार वातावरण तापले आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. यावरुन फक्त बीड नाही तर संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमध्ये न्याय मिळण्यासाठी बीडमध्ये विराट मूक मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये सर्व पक्षीय मूक मोर्चामध्ये राजकीय नेते देखील सामील झाले आहेत. स्वराज पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी देखील बीडमधील या मूक मोर्चामध्ये उपस्थिती लावून राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. तसेच या खून प्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आलेले आहे. मात्र त्याला देखील अद्याप अटक करण्यात आलेली नाही. वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये निकटचे संबंध असून यामुळे त्याला अटक केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरोपी अद्याप मोकाट असल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. याच मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रकाश टाकला असून रोष व्यक्त केला आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांचा जीवनप्रवास जाणून घ्या एका क्लिकवर

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “हे घडलेला प्रकार अत्यंत दुर्देवी आहे, क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे वेदनादायी आहे. वाईट आहे, जे आरोपी आहेत त्यांना अजूनही अटक केलेली नाही. वाल्मिक कराड बिनधास्त फिरतोय. त्याचे आश्रयदाते यांचा राजीनामा का घेत नाही? मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी सांगितलं होतं, यांना मंत्रिपद देऊ नका. यांना मंत्रिपद दिलं, तर न्याय देण्यात गडबड होऊ शकते,” असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे.

त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत संभाजीराजे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “हा विषय संवेदनशील असल्यामुळे या मिनिटाला भाष्य करणं योग्य होणार नाही. त्यांनी जे स्टेटमेंट केलय, त्या संदर्भातील माहिती एसपींकडे दिलीय” “आज महाराष्ट्र किंवा बीड बिहारसारखं करायचं आहे का? पंकजा मुंडे म्हणाल्या की, वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंच पानही हलत नाही. अनेक व्यवहारात त्यांची भागीदारी आहे. वाल्मिक कराड कुठे लपला आहे, ते तुम्हाला माहित नाही. तुम्ही मंत्री म्हणून अटक करण्याची जबाबदारी घेत नाही. मुख्यमंत्री म्हणतात मोक्का लावणार ते चालणार नाही. तात्काळ अटक करा, मोहरक्या वाल्मिक कराडला आत कसं घेणार, त्यावर बोला” अशा कडक शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुढे संभाजीराजे छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “माझी पहिली मागणी, मी महाराष्ट्रातला एकमेव नेता होतो, मी स्पष्टपणे सांगितलेलं, अजित पवारांना सांगितलेलं यांना मंत्रिपद देऊ नका. आज अजित पवारांसमोर गोष्टी आहेत. हा कुठल्या जातीचा मोर्चा नाही, तरी तुम्ही यावर का बोलत नाही? महाराष्ट्रामध्ये भीषण स्थीती आहे. यावरुन मला बोलायला लाज वाटत आहे,” असा घणाघात संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

Web Title: Sambhajiraje chhatrapati expressed anger over the santosh deshmukh murder case in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 01:03 PM

Topics:  

  • Sambhajiraje Chhatrapati
  • Santosh Deshmukh Murder

संबंधित बातम्या

PRADA ने केली कोल्हापूरी चप्पलची चोरी? श्रेय न दिल्याने संभाजीराजे छत्रपती भडकले, थेट केली ‘ही’ मोठी मागणी
1

PRADA ने केली कोल्हापूरी चप्पलची चोरी? श्रेय न दिल्याने संभाजीराजे छत्रपती भडकले, थेट केली ‘ही’ मोठी मागणी

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; संतोष देशमुखांच्या मुलाच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी
2

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; संतोष देशमुखांच्या मुलाच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

Shivarajyabhishek sohola 2025 : रायगडावर शिवराज्याभिषेक देदीप्यमान सोहळा दिमाखात पार
3

Shivarajyabhishek sohola 2025 : रायगडावर शिवराज्याभिषेक देदीप्यमान सोहळा दिमाखात पार

Kille Raigadh: मोठी बातमी! रायगड किल्ल्यावर ‘यंत्रराज’चा शोध; दुर्गराजाच्या विज्ञानाधिष्ठित बांधकामाचा पुरावा
4

Kille Raigadh: मोठी बातमी! रायगड किल्ल्यावर ‘यंत्रराज’चा शोध; दुर्गराजाच्या विज्ञानाधिष्ठित बांधकामाचा पुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.