Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थातुर मातुर उपाय काढून चालणार नाही…; मराठा आंदोलनाबाबत काय म्हणाले विनायक राऊत?

ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत आक्रमक झाले आहे. सिंधुदुर्गामध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 29, 2025 | 04:23 PM
Shivsena vinayak raut on manoj jarange patil Maratha reservation Mumbai news update

Shivsena vinayak raut on manoj jarange patil Maratha reservation Mumbai news update

Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील हे हजारो मराठा बांधवांसह मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तर संपूर्ण मुंबईमध्ये मराठा समर्थक जमा झाले आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत आक्रमक झाले आहे. सिंधुदुर्गामध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाला आहे. हे पाहिल्यावर सध्याच्या राजकारण्यांना मराठा समाजाच्या आंदोलनबाबत थातुर मातुर उपाय काढून चालणार नाही. यावर ठोस निर्णय घ्यावाच लागेल हे लक्षात आले असेल, असे मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत म्हणाले की, आरक्षणाबाबत मर्यादा वाढविण्याबाबतची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करावी. मनोज जरांगे पाटील यांना या आंदोलनाद्वारे यश नक्कीच मिळेल, ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यातील मराठा समाज जरांगे यांच्या बरोबर आहे. त्यांना नक्की यश मिळेल, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.

भागवत यांनी ही शिकवण भाजप मंत्रिमंडळात द्यावी

इस्लाम धर्म हा भारतामध्ये अनेक वर्षांपासून असून इस्लाम भारतात आल्यापासूनच आहे आणि इथेच राहील. इस्लाम या हिंदू विचारसरणीसारखा नाही. हिंदू विचारसरणी अशी नाही. आपण एक आहोत असा विश्वास ठेवावा लागेल. दोन्ही बाजूंनी विश्वास निर्माण होईल, मग हा संघर्ष संपेल, असे मोहन भागवत यांनी आरएसएसच्या १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले. यावर विनायक राऊत म्हणाले की, भागवत यांनी ही शिकवण भाजप मंत्रिमंडळात असलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांना द्यावी. आणि उपदेशाचे डोस पाजावेत. धर्मांमध्ये भांडणे लावण्यामध्ये नितेश राणे अग्रेसर आहेत, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

चिपी-मुंबई सेवेबाबत देखील माजी खासदार विनायक राऊत यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, कॅबिनेटमध्ये चिपी विमानतळाबाबत निर्णय करण्याचा सरकारला अधिकार नाही. चिपी विमानतळ हा प्रश्न केंद्र सरकारशी निगडित आहे. हा प्रश्न केंद्रीय हवाई वाहतूक उड्डाण मंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. दुर्दैवाने हा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम खासदार मिळाला नाही, हे सिंधुदुर्गवासीयांचे दुर्दैव आहे, असे म्हणत विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे यांना टोला लगावला आहे.

Web Title: Shivsena vinayak raut on manoj jarange patil maratha reservation mumbai news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

महिला आरक्षण विधेयक भाजपचे राजकीय षडयंत्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा पक्षीय अजेंडा; विनायक राऊतांचा आरोप
1

महिला आरक्षण विधेयक भाजपचे राजकीय षडयंत्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा पक्षीय अजेंडा; विनायक राऊतांचा आरोप

VINAYAK RAUT : “महिला विधेयक नव्हे तर ते एक षडयंत्र होते”; महिला विधेयकावर हे काय बोलले राऊत
2

VINAYAK RAUT : “महिला विधेयक नव्हे तर ते एक षडयंत्र होते”; महिला विधेयकावर हे काय बोलले राऊत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.