Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin yojana : “महायुतीमधील ‘त्या’ नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा…”; राजू शेट्टी नेमके भडकले का?

महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. मात्र या योजनेतील महिलांना अपात्र ठरवल्यामुळे राजकारण रंगले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 11, 2025 | 03:55 PM
शेतकऱ्यांच्या दूध बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; 7 दिवसांत थकीत रक्कम न दिल्यास...

शेतकऱ्यांच्या दूध बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; 7 दिवसांत थकीत रक्कम न दिल्यास...

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. या योजनेमधून अपात्र महिलांच्या डोक्यावर अर्ज बाद होण्याची टांगती तलवार आहे. निवडणुकीनंतर महायुती सरकारने अर्ज छाननी प्रक्रिया सुरु केली. निवडणुकीच्या तोंडावर योजना जाहीर करण्यात आली. तसेच सर्वच अर्जदार महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र निवडणुकीनंतर अर्ज बाद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महायुती सरकारकडून 2024च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महा दीड हजार रुपये खात्यामध्ये जमा करण्यात येत होते. निवडणुकीच्यापूर्वी ही योजना जाहीर झाल्यामुळे अल्पावधींमध्ये ती लोकप्रिय झाली. महायुतीच्या नेत्यांनी योजनेचा जोरदार प्रचार देखील केला. निवडणुकीच्या प्रचारामध्ये पुन्हा सरकार आल्यानंतर 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सुरु केली. यामुळे विरोधकांसह राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. यावरुन आता राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय म्हणाले राजू शेट्टी?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुरुवातीला पात्र महिलांना पैसे देऊन नंतर त्यांना अपात्र ठरवणाऱ्या महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. राजू शेट्टी म्हणाले की, “निवडणुकीनंतर हे असंच होणार होतं. हे आता लोकांच्या लक्षात येत आहे. ही योजना एक सरकारी खात्यामधील पैशांतून महिलांना दिलेली लाच होती. लाडकी बहीण योजना, आनंदाची शिधा आणि महायुतीच्या इतर योजना या निवडणुकीसाठी मतदारांना दिलेल्या लाच होत्या आणि ती तेवढ्या काळापुरती होती,” असा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

राजू शेट्टी पुढे म्हणाले की, “आपल्या राज्याची अर्थिक स्थिती नाजूक असल्याचे हे महायुतीच्या नेत्यांना माहिती होते. तरी देखील तत्कालीन मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत जनतेची मतं घेण्यासाठी हा बनवा केला. या फसवणुकीविरोधात महायुतीमधील नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी जोरदार मागणी राजू शेट्टी यांनी केली. या योजनेतून पाच लाख महिला गायब झाल्या आहेत. अजून किती बहिणी गायब होतील हे समोर येईलच,” अशा कडक शब्दांत राजू शेट्टी यांनी महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त खर्च

पहिल्यांदाच माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या आणि त्यांच्यावर झालेल्या खर्चाची किंमत समोर आली आहे. ही किंमती ऐकून सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये ही संख्या 2.46 कोटी होती. मात्र अर्जाची छाननी केल्यानंतर ही संख्या पाच लाखांनी कमी झाली आहे. सध्या लाडक्या बहिणींच्या लाभार्थी महिलांची संख्या 2.41 कोटींवर आली आहे. त्यामुळे अपात्र महिलांमुळे राज्याच्या तिजोरीमधील कोट्यवधी रुपये गेले आहेत. अपात्र महिलांनाही योजनेचे सहा महिन्यांचे हप्ते दिल्यामुळे सरकारला 450 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही रक्कम परत घेण्यात येणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे सरकारचे 450 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Swabhimani shetkari sanghatana raju shetty targets the mahayuti for ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Mahayuti Governmet
  • raju shetty

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana : ‘लाडकीं’ना फक्त ५ दिवसांचा अवधी, ४० हजार ई-केवायसी बाकी
1

Ladki Bahin Yojana : ‘लाडकीं’ना फक्त ५ दिवसांचा अवधी, ४० हजार ई-केवायसी बाकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.