Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assembly Election: ” हिंदू समाजाने ठरवलेलं आहे, महायुतीला विजयी करणार”; नितेश राणे यांचं वक्तव्य 

सध्या राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. रााज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटात चुरशीची लढत सुरु आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 02, 2024 | 03:27 PM
महायुतीची दिवाळी गोड करायची; हिंदु समाज महायुतीच्या पाठीशी- नितेश राणे

महायुतीची दिवाळी गोड करायची; हिंदु समाज महायुतीच्या पाठीशी- नितेश राणे

Follow Us
Close
Follow Us:

कणकवली/भगवान लोके:  विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात नवी समीकरणं तयार होत आहे. दरम्यान या सगळ्यावर भाजपा प्रवक्ते नितेश राणे यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. या विधानसभा निवडणुकीत २३ नोव्हेंबरला माझी जनता परत एकदा पाच वर्ष मला त्यांची सेवा करण्याची संधी देईल. माझ्या विरोधात मैदानात कोणी यायलाच तयार नाही. शेवटी काम माझ्या मतदार संघात झालेले आहे. त्यामुळे माझ्या जनतेने मला पुन्हा निवडुन देण्याचे ठरवले आहे. कदाचित ही बातमी माझ्या प्रतिस्पर्ध्यांकडे पोहोचलेली आहे. त्यामुळेच माझ्या मतदार संघात राज्यात सर्वांत कमी उमेदवार उभे राहीले आहेत.जनतेनेच ठरवले आहे, महायुतीची दिवाळी गोड करायची आहे. हिंदु समाज महायुतीच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत २३ नोव्हेंबरला तुम्हाला धमाके दिसणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने, माता भगिनींनी ठरवलं आहे की, यंदाच्या दिवाळी ही महायुतीसाठी साजरी करायची. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील हिंदू समाजाने ठरवलेलं आहे की, ज्यांच्यामुळे आज आम्ही मोकळ्या पद्धतीने हिंदू सण साजरा करू शकतो, त्या महायुतीला परत निवडून द्यायचे आहे. माझ्या मतदारसंघामध्ये ४१ हजारांची लीड लोकसभेला खा.नारायण राणे यांना होती.

पुढे राणे असंही म्हणाले की, शासनाच्या माध्यामातून लोकांची सेवा करतोय, माझ्या मतदार संघातील कधीही त्यांच्या समोर लोकप्रतिनिधी किंवा कुठला राजकीय कार्यकर्ता म्हणून गेलो नाही. मी घरातला भाऊ, मुलगा, मित्र म्हणून मी त्यांच्याबरोबर वावरलेलो आहे, म्हणून मला विश्वास आहे. दहा वर्ष ज्या प्रामाणिक पद्धतीने मी त्यांची सेवा केलेली आहे. त्याचप्रमाणे पुढील पाच वर्षे माझ्या मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी राहणार असा विश्वास देखील आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा-“महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जनतेची काम करण्याची धमक आहे”; आमदार प्रशांत ठाकूर

दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातली कडवी स्पर्धा पहायला मिळत आहे. कणकवली विधानसभा मतदार संघ देखील याला अपवाद नाही. राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली मतदार संघात महायुतीकडून ठाकरे गटाला शह देेण्यासाठी कडवा प्रतिसााद दिला जात आहे. काही दिवसांपूर्वीच राणे यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली होती. नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊत यांनी युतीत होते तेव्हाचे दिवस आठवावे. भाजप सोबतचा इतिहास तपासावा, तेव्हा कसे होता ? तेव्हा काय मान सन्मान कसा होता.आता असा कचरा केला आहे की 88 जागा घ्यायच्या तर घ्या नाहीतर बाजूला व्हा.

हेही वाचा-Prakash Ambedkar Health Update : प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीबाबत मुलाने दिली अपडेट; कार्यकर्त्यांना केले ‘हे’ आवाहन

पुढे राणे असंही म्हणाले होते की, राहुल गांधींच दर्शन उद्धव ठाकरेंना दूरच झालेलं आहे. कारण राहुल गांधीच्या डाव्या उजव्यासोबत उद्धव ठाकरेंना भोगावं लागत आहे. राहुल गांधी यांच्याजवळ पास पण नाही. नियतीचा खेळ असा आहे की राहुल गांधी उद्धव ठाकरेंचा आता फोनही घेत नाही आहेत. 2019 ला सत्ता स्थापनेवेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा फोन घेतला नाही. आज राहुल गांधी यांचे फोन घेत नाही, याला नियतीचा फेरा म्हणतात. उगाच छाती ताणून दाखवू नका तुमची लायकी काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला योग्य पद्धतीने दखवलेली आहे. अशी कडव्या शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.त्यामुळे निडवणूकीची ही लढत अतीतटीची होत आहे. त्यामुळे कणकवलीचा बालेकिल्ला राणे आणि महायुती राखणार की महाविकास आघाडी विजय मिळवणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.

Web Title: The hindu community has decided to make the mahayuti victorious statement by nitesh rane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 03:26 PM

Topics:  

  • Assembly Election
  • kankavali

संबंधित बातम्या

Kankavli News: ठाकरे गट सत्ताधारी पक्षातील कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही; माजी आमदार वैभव नाईकांचे वक्तव्य
1

Kankavli News: ठाकरे गट सत्ताधारी पक्षातील कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही; माजी आमदार वैभव नाईकांचे वक्तव्य

संतापजनक! डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्णाचा मृत्यू; चेकअप करून घरी गेला अन् थोड्याच वेळात…
2

संतापजनक! डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्णाचा मृत्यू; चेकअप करून घरी गेला अन् थोड्याच वेळात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.