
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात आषाढ अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही तिथी पूर्वजांना समर्पित केलेली आहे. या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच पितरांचे तर्पण, श्राद्ध देखील केले जाते. यामुळे कुटुंबावर पितरांची कृपा राहते आणि पितृदोष देखील दूर होतो अशी श्रद्धा आहे. या दिवशी दानधर्म करणे व पवित्र नदीत स्नान करणे, अध्यात्मिक व धार्मिक कार्ये करणे तसेच ध्यान धारणा करणे, पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे. यासोबतच, आषाढ अमावस्येला गोर गरिबांना किंवा ब्राम्हणाला दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. याशिवाय हा दिवस काही खास ज्योतिष उपायांसाठी विशेष मानला जातो.
पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीची सुरुवात मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजून ५३ मिनिटांनी होत आहे आणि अमावस्येची समाप्ती १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ६ मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे आषाढ अमावस्या यंदा बुधवार, १२ ऑगस्ट रोजी असेल. यामुळे पितृ कर्माशी संबंधित कामे १२ ऑगस्ट रोजी करावी आणि याच दिवशी नदीत स्नान आणि दान करणे देखील शुभ राहील.
आषाढ अमावस्या ही पितरांना समर्पित असलेली तिथी मानली जाते. या दिवशी पितृदेवतांना तर्पण आणि पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्यास शांती लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच पितृदोष कमी होण्यासाठीही या दिवसाचे विशेष महत्त्व सांगितले जाते.
आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असल्याने हा दिवस आध्यात्मिक शुद्धीकरण आणि नवीन धार्मिक पर्वाची तयारी म्हणूनही महत्त्वाचा मानला जातो.
आषाढ अमावस्येला पितरांचे स्मरण करून केलेले तर्पण अत्यंत फलदायी मानले जाते. धर्मग्रंथांनुसार या दिवशी श्रद्धेने केलेल्या पितृसेवेने कुटुंबावर पितरांची कृपा राहते आणि घरातील सुख-समृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे.
सकाळी लवकर उठून पवित्र नदी, तलाव किंवा घरी स्नान करावे.
सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून पितरांसाठी तर्पण करावे.
भगवान शिव, भगवान विष्णू आणि दत्तगुरूंची पूजा करावी.
गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र, धान्य किंवा दक्षिणेचे दान करावे.
पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी.
दिवसभर सात्त्विक आहार घ्यावा आणि शक्य असल्यास उपवास करावा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला आषाढ अमावस्या म्हणतात. हा दिवस पितृपूजा, तर्पण आणि दानधर्मासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो.
Ans: या दिवशी पितरांना तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि पितृदोष कमी होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Ans: आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे हा दिवस श्रावणातील धार्मिक उपासना आणि शिवभक्तीची पूर्वतयारी मानला जातो.