Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडला जातो? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

नारळ हे फक्त फळ नसून शुभ कार्याची सुरुवात, समृद्धी, सौभाग्य आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. महिलांनी नारळ फोडू नये ही श्रद्धा आहे. शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडला जातो ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 27, 2025 | 09:19 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडला जातो
  • ज्योतिषशास्त्रातील नारळाचे महत्त्व
  • शुभ कार्यात नारळाचा वापर
 

ज्यावेळी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते. त्यावेळी सर्वांत आधी नारळ फोडला जातो किंवा देवाच्या समोर पहिले ठेवला जातो. बऱ्याच वेळा आपण पाहिले की, वाहनाची पूजा असो, नवीन दुकानाचे उद्घाटन असो, लग्नाचे विधी असो, घरामध्ये ग्रहप्रवेश असो, व्यवसायाची सुरुवात असो किंवा मंदिरातील कोणतीही विशेष पूजा असो… सर्वत्र प्रथम नारळ अर्पण केला जातो किंवा फोडला जातो. हा केवळ विधी नसून पिढ्यानपिढ्या अनुभवांना मूर्त स्वरूप देणारे श्रद्धेचे एक पैलू आहे. नारळ फोडणे म्हणजे देवासमोर तुमचे हेतू आणि स्पष्ट विचार व्यक्त करणे. तुम्ही जे काम सुरू करत आहात त्यात कोणतेही विघ्न येऊ नये, वाईट नजरेपासून दूर राहावे. नारळ हा केवळ पूजेचा भाग मानला जात नाही तर समृद्धी, सौभाग्य आणि शुभतेचे प्रतीक देखील मानले जाते. प्रत्येक शुभ कार्यात नारळ का फोडला जातो जाणून घ्या

पूजेमध्ये नारळाचा वापर का करतात

हिंदू परंपरेनुसार नारळाला श्रीफळ म्हणतात आणि ते देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. नारळावरील तीन डोळे त्रिमूर्तीचे प्रतीक आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणून, कोणत्याही शुभ कार्यात त्याचा समावेश केल्याने तिन्ही देवांकडून आशीर्वाद मिळतो असे मानले जाते.

नारळाचे कठीण बाहेरील कवच जीवनातील आव्हानांचे प्रतिनिधित्व करते, तर आतील पांढरा भाग मनाची शुद्धता आणि सकारात्मक विचारांचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होते.

Zodiac Sign: त्रिपुष्कर योगामुळे मेष आणि कन्या राशीसह या राशींच्या लोकांना होईल फायदा

तसेच नारळ कधीही खराब होत नाही किंवा त्यांना कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी नारळ ठेवला जातो त्या ठिकाणची नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत होते. या कारणांमुळे दुकाने, घरे, कार्यालये, कारखाने आणि मंदिरामध्ये नारळ ठेवला जातो.

महिला नारळ का फोडत नाहीत?

नारळ हे एक बीज मानले जाते, जे निर्मितीच्या शक्तीचे प्रतीक आहे. महिलांमध्ये निर्मिती करण्याची उपजत क्षमता असते कारण त्या गर्भधारणा करतात आणि नवीन जीवाला जन्म देतात. या कारणास्तव असे म्हटले जाते की बियांच्या स्वरूपात असलेले फळ तोडणे योग्य मानले जात नाही.

याचा अर्थ असा होतो की, निसर्गाच्या तत्वांवर रुजलेली परंपरा आहे. आज काळ बदलत आहे, मानसिकता बदलत आहे आणि अनेक ठिकाणी महिला नारळही फोडतात. मात्र पुरुषांनी नारळ फोडणे खूप शुभ मानले जाते.

नारळाचे हे करा उपाय

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी नारळाचे उपाय

जर तुमच्या घरात पैसा येतो पण राहत नाही, खर्च वाढत आहे किंवा बचत होत नाही, तर लाल कापडात एक संपूर्ण नारळ बांधून तो देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर तो तुमच्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा.

Chandra Gochar 2025: 27 डिसेंबरला चंद्राचे संक्रमण ठरणार लकी, पैशांच्या अडचणी होतील दूर

शनि दोष दूर करण्यासाठी उपाय

शनिवारी, एक सुका नारळ तुमच्या डोक्यावरून घड्याळाच्या उलट दिशेने सात वेळा फिरवा आणि नंतर तो नदीत फेकून द्या. असे मानले जाते की यामुळे शनि ग्रहाशी संबंधित समस्या कमी होतात आणि मनःशांतीची भावना येईल.

राहू-केतूच्या प्रभावापासून आराम

कधीकधी, अकारण ताण, चिंता, भीती आणि अडथळे उद्भवतात. असे मानले जाते की नारळ साखरेने भरून ते एका निर्जन ठिकाणी मातीत गाडल्याने राहू आणि केतूमुळे होणारे दुःख कमी होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडला जातो?

    Ans: हिंदू धर्मात नारळ फोडणे हे शुभता, शुद्धता आणि यशाचे प्रतीक मानले जाते. कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फोडल्याने कार्य निर्विघ्न पूर्ण होते अशी श्रद्धा आहे.

  • Que: नारळ फोडण्यामागील धार्मिक परंपरा काय आहे?

    Ans: नारळाला श्रीफळ म्हटले जाते. तो भगवान गणेश, विष्णू आणि देवी-देवतांना प्रिय मानला जातो. शुभ कार्यात नारळ अर्पण करून देवाची कृपा मागितली जाते.

  • Que: नारळ फोडण्यामागे शास्त्रीय कारण आहे का?

    Ans: नारळ फोडल्याने मनात नवीन सुरुवातीचा सकारात्मक भाव निर्माण होतो. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि कामात एकाग्रता येते.

Web Title: Astro tips why is a coconut broken before an auspicious event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 09:19 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Katas Raj Temple: पाकिस्तानातील कटसराज मंदिर का आहे हिंदूंसाठी पवित्र? जाणून घ्या भगवान शंकरांच्या अश्रूंशी काय आहे संबंध
1

Katas Raj Temple: पाकिस्तानातील कटसराज मंदिर का आहे हिंदूंसाठी पवित्र? जाणून घ्या भगवान शंकरांच्या अश्रूंशी काय आहे संबंध

Shivlilamrita: शिवलीलामृताच्या पाचव्या अध्यायाचे पारायण कोणत्या दिवशी करावे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Shivlilamrita: शिवलीलामृताच्या पाचव्या अध्यायाचे पारायण कोणत्या दिवशी करावे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Budh Vakri 2026: बुधाच्या वक्री चालींचा या राशींच्या लोकांना आजपासून बसणार आर्थिक फटका
3

Budh Vakri 2026: बुधाच्या वक्री चालींचा या राशींच्या लोकांना आजपासून बसणार आर्थिक फटका

Vat Purnima 2026: नवविवाहित महिलांनी अशी साजरी करावी पहिली वटपौर्णिमा, मिळेल अखंड सौभाग्याचे आशीर्वाद
4

Vat Purnima 2026: नवविवाहित महिलांनी अशी साजरी करावी पहिली वटपौर्णिमा, मिळेल अखंड सौभाग्याचे आशीर्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.