Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakya Niti: पुरुषांच्या या चुका त्यांचे वैवाहिक जीवन करु शकते उद्ध्वस्त, नरकापेक्षाही वाईट बनते जीवन

लग्नानंतर अशा काही गोष्टीकडे पुरुषांनी दुर्लक्ष केल्यास त्यांचे नाते कमकुवत होऊ शकते. चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ज्या व्यक्तीच्या सवयींमुळे छोट्या गोष्टींचा नात्यावर परिणाम होतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 05, 2025 | 12:05 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आचार्य चाणक्य हे एक महान नीतिशास्त्रज्ञ आणि सखोल विचारवंत होते. जीवनाच्या प्रत्येक पैलूचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्या अनुभवांना त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये स्थान दिले. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात आणि काही चुका झाल्या तर नातेसंबंध बिघडतातच पण आयुष्यात अशांतताही निर्माण होते. लग्नानंतर पुरुषांनी कोणच्या चुका करु नये, जाणून घ्या

पत्नीचा अपमान करु नये

चाणक्याच्या म्हणण्यानुसार, जो पुरुष आपल्या पत्नीचा आदर करत नाही त्या व्यक्तींच्या जीवनात कधीही सुख आणि शांती असू शकत नाही. पत्नी ही केवळ जीवनसाथीच नाही तर ती घराच्या संपत्तीची देवी देखील आहे. जर तुम्ही तिचा अनादर केला तर घरातील वातावरण बिघडेल आणि नात्यांमध्ये अंतर वाढेल. इतरांसमोर पत्नीची चेष्टा करणे किंवा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे ही एक मोठी चूक आहे.

Kendra Yog: शनि देव तयार करणार एक शक्तिशाली केंद्र राज योग, या राशींना होणार आर्थिक लाभ

इतर कोणाशी तुलना करणे

चाणक्यांच्या मते, तुलना नेहमीच न्यूनगंड आणि संताप निर्माण करते. जर तुम्ही तुमच्या पत्नीची तुलना इतर कोणत्याही स्त्रीशी केली, मग ती तिची बहीण असो, शेजारी असो किंवा चित्रपट अभिनेत्री असो, तर त्यामुळे तिचा स्वाभिमान दुखावतो. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे खास गुण असतात आणि पत्नीचे गुण समजून घेतले पाहिजेत आणि त्या गुणांची कदर केली पाहिजे.

घरातील गोष्टी बाहेर न सांगणे

लग्नानंतर एक गोष्ट महत्त्वाची मानली जाते ती म्हणजे गुप्तता. चाणक्याच्या मते, घरातील गोष्टी, विशेषतः पत्नीशी संबंधित गोष्टी, मित्रांना, नातेवाईकांना किंवा पालकांना सांगणे खूप हानिकारक असू शकते. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तुमच्या पत्नीला अस्वस्थ वाटू शकते. घरातील समस्यांचे निराकरण घरातच शोधले पाहिजे.

Astro tips:चांदीची साखळी लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त आहे का? जाणून घ्या त्याचे फायदे

पत्नीला वेळ न देणे

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहवास आणि संवाद. जर लग्नानंतर पुरूष आपल्या पत्नीला वेळ देत नसेल आणि तिचे ऐकत नसेल तर हळूहळू नात्यात दुरावा निर्माण होतो. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी दिवसातील काही वेळ तुमच्या पत्नीसोबत घालवलाच पाहिजे.

रागाच्या भरात पत्नीला चुकीचे बोलणे

रागाच्या भरात केलेला अपमान कधीच विसरला जात नाही. चाणक्य म्हणतात की, जेव्हा एखादा पुरूष रागावतो तेव्हा तो आपली बुद्धिमत्ता गमावून बसतो आणि असे शब्द बोलतो जे हृदयाला छेदू शकतात. जर तुम्ही रागाच्या भरात तुमच्या पत्नीला शिवीगाळ केली तर त्याचा परिणाम बराच काळ टिकतो. म्हणून, जर तुम्हाला राग आला तर गप्प राहा, पण कठोर शब्द बोलू नका.

पत्नीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे

बऱ्याच पुरुषांना असे वाटते की त्यांना सर्व काही माहीत आहे आणि त्यांच्या पत्नीच्या मताची गरज नाही. चाणक्याच्या म्हणण्यानुसार, पत्नीची बुद्धिमत्ता, अनुभव आणि भावना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा तिचा छोटासा सल्ला मोठे नुकसान टाळू शकतो. म्हणून तिचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका आणि ती काय म्हणते याचा विचार करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Chanakya niti these mistakes of men can ruin their marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Dhan Shakti Rajyog: शुक्र आणि मंगळाच्या युतीमुळे या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे होतील पूर्ण, प्रत्येक कामात मिळेल यश
1

Dhan Shakti Rajyog: शुक्र आणि मंगळाच्या युतीमुळे या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे होतील पूर्ण, प्रत्येक कामात मिळेल यश

Paush Purnima: पौष पौर्णिमेला आकाशात झळकणार पूर्ण चंद्र, जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व
2

Paush Purnima: पौष पौर्णिमेला आकाशात झळकणार पूर्ण चंद्र, जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व

Zodiac Sign: ब्रह्म योगासह तयार होत आहे आदित्य योग, मेष आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ
3

Zodiac Sign: ब्रह्म योगासह तयार होत आहे आदित्य योग, मेष आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

Numberlogy: पौर्णिमेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची काळजी
4

Numberlogy: पौर्णिमेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांनी घ्यावी आरोग्याची काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.