Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सव 10 दिवस का साजरा केला जातो काय आहे? यामागील परंपरा आणि महत्त्व

भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून गणेश चतुर्थीची सुरुवात होते आणि हा उत्सव 10 दिवस चालतो. यामागे धार्मिक कारणे आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या, लोकमान्य टिळकांनी याला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 24, 2025 | 03:51 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय सणांपैकी एक सण आहे. हा सण भक्तीपूर्ण आणि उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. म्हणजे एकूण 10 दिवसांचा हा उत्सव असतो. यावेळी 10 दिवसांमध्ये प्रत्येक घरांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. भक्त त्यांची मनापासून पूजा करतात. पहिल्या दिवशी गणपतीची स्थापना करण्याची आणि शेवटच्या दिवशी त्याचे विसर्जन करण्याची परंपरा या उत्सवाला खास आहे. मात्र गणेशोत्सव फक्त 10 दिवसांसाठीच का साजरा केला जातो, कमी किंवा जास्त नाही. यामागील धार्मिक किंवा ऐतिहासिक घटना आणि समाजाला जोडणाऱ्या परंपरांशी काय संबंध आहे. गणेशोत्सव 10 दिवस का साजरा केला जातो, काय आहे यामागील कारण जाणून घ्या.

गणेश चतुर्थी 10 दिवस का साजरा करतात

धार्मिक मान्यतेनुसार, गणपतीला विघ्नांचा नाश करणारा आणि उद्‌घाटनाचा प्रतीक मानले जाते. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला याची स्थापना केली जाते आणि मानले जाते की, ते 10 दिवस भक्तांच्या घरी राहतात आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करतात. पुराणांमध्ये उल्लेख केल्यानुसार गणपती बाप्पाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला. म्हणून या दिवसांपासून गणेश चतुर्थीची सुरुवात होते आणि विसर्जन 10 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी होते.

Dream Science: स्वप्नात गणपती बाप्पा दिसल्यास मिळतात हे संकेत, चमकेल तुमचे भाग्य

काय आहे 10 दिवसांमागील ऐतिहासिक कारण

इतिहासकारांच्या मते, पेशव्यांच्या काळापासून 10 दिवस गणेश चतुर्थी साजरी करण्याची परंपरा सुरू आहे. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या उत्सवाला जनचळवळ आणि एकतेचे माध्यम बनवले. त्यांनी ते खाजगी पूजेपासून सार्वजनिक उत्सवात रूपांतरित केले जेणेकरून लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊ शकतील आणि सामाजिक एकता वाढू शकेल. त्यावेळेपासून गणेशोत्सव सार्वजनिकरित्या 10 दिवस साजरा केला जातो.

10 व्या दिवशी विसर्जन का करतात

धार्मिक मान्यतेनुसार, गणपती बाप्पा भक्तांच्या घरी फक्त पाहुणे म्हणून येतात. पाहुण्याला निरोप देणे हे त्याचे स्वागत करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे दहाव्या दिवशी विसर्जन करणे महत्त्वाचे मानले जाते. याचा संबंध निसर्गचक्राशी देखील जोडलेले आहे. कारण मातीपासून बनवलेली मूर्ती पाण्यात विरघळते आणि ती पुन्हा मातीत बदलते त्यामुळे त्याला जीवन आणि मृत्यूच्या चक्राचे प्रतीक मानली जाते.

MahaBhagya Yog: महाभाग्य योगामुळे या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ, राहील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

दीड, तीन, पाच, सात दिवसांत का विसर्जन केले जाते

प्रत्येक कुटुंबामध्ये परंपरा वेगवेगळी असते. बऱ्याच ठिकाणी लोक दीड, तीन, पाच, सात दिवस गणपतीची स्थापना करतात नंतर त्याचे विसर्जन करतात. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये पूजा करण्याची आणि पाहुण्यांना जास्त काळ पाहुण्यांचे आतिथ्य करण्याची सुविधा नसते. जुन्या श्रद्धेनुसार एक छोटासा उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो.

समाज आणि संस्कृतीमधील महत्त्व

गणेश चतुर्थीच्या या 10 दिवसामध्ये संपूर्ण समाजात भक्ती आणि उत्सवाचे वातावरण असते. मकर सजवले जाते, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लोक एकत्र भक्तिगीते गातात. हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक उत्सव देखील आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Ganesh chaturthi 2025 the importance of the tradition behind celebrating ganeshotsav for 10 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • dharm
  • Ganesh Chaturthi 2025
  • religions

संबंधित बातम्या

Panchak Upay: पंचक दोष टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय, राहूचा तणाव होईल दूर
1

Panchak Upay: पंचक दोष टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय, राहूचा तणाव होईल दूर

Shadashtak Yog: २ सप्टेंबरला शनि-शुक्र षडाष्टक योग! या राशींवर होऊ शकतो करिअर आणि आरोग्यावर परिणाम
2

Shadashtak Yog: २ सप्टेंबरला शनि-शुक्र षडाष्टक योग! या राशींवर होऊ शकतो करिअर आणि आरोग्यावर परिणाम

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या
3

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या

Puja Tilak: पूजेत केसर, चंदनासह किती प्रकारचे टिळा लावतात? जाणून घ्या प्रत्येकाचे धार्मिक महत्त्व
4

Puja Tilak: पूजेत केसर, चंदनासह किती प्रकारचे टिळा लावतात? जाणून घ्या प्रत्येकाचे धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.