Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपतीच्या पूजेदरम्यान दुर्वा वाहिलेली चालते तुळस का वाहत नाही? जाणून घ्या पौराणिक कारण

येत्या काही दिवसातच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. हिंदू धर्मामध्ये तुळस पवित्र मानली जाते. गणपती बाप्पाच्या पूजेदरम्यान दुर्वा आणि जास्वंदाच फूल वाहतात. परंतु तुळस वाहत नाही. याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली गेली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 31, 2024 | 03:32 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू देवतांना विविध वैशिष्ट्य लाभलेले आहे. सर्व देव हे निसर्गाशी जोडलेले गेले आहेत. शंकराला बेल, कृष्णाला तुळस, विष्णूला कमळ तर गणपतीला दुर्वा प्रिय आहेत, असे म्हटले जाते. गणपती बाप्पाला मोदक, लाडू हे पदार्थ खूप आवडतात. तसेच गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाच लाल फूल वाहतात त्याशिवाय गणपतीची पूजा पूर्ण होत नाही. मात्र हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी तुळस गणपतीला वाहत नाही, ती वर्ज्य मानली जाते. यामागे एक पौराणिक कारण आहे ते जाणून घेऊया.

सगळीकडे बाप्पाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. बाप्पासाठी मखर, नैवेद्य, आरती इत्यादींची तयारी सुरु झाली आहे. गणपती बाप्पाच्या पूजेसाठी महत्त्वाच स्थान असतं ते म्हणजे दुर्वा. बाप्पाच्य़ा पूजेच्या वेळी 21 दुर्वांची जुडी वाहण्याची प्रथा आहे. असे म्हणतात की, पुराणात अनालसुराला गिळून गणपतीने देवांची असुरांपासून सुटका केली होती. या असुराला गिळल्यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्यामुळे गणपतीच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्यामुळे त्याला आराम मिळाला. तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्याची परंपरा आहे. शिवाय गणपतीला दुर्वा फारच प्रिय आहेत, असे म्हटले जाते.

हेदेखील वाचा- अकाली मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला कशी मिळेल शांती, काय सांगते गरुड पुराण

गणपतीला तुळस का वाहत नाही

पौराणिक कथेनुसार, राजा धर्मात्मजची कन्या तुळशी ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की तरुण गणेश गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. पौराणिक कथेनुसार, भगवान तपस्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते. गळ्यात रत्नांची माळ होती. कमरेत रेशमचे पितांबर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते.

हेदेखील वाचा- गणेशोत्सवात गणपती बाप्पाची कोणत्या रंगाची मूर्ती घरी आणावी? जाणून घ्या

गणपतीचे ते सुंदर स्वरुप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपस्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे त्यांनी वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला.

हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की, तुझे एक नाही दोन विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की, तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली.

यानंतर, गणेशजी म्हणाले, तू भगवान विष्णू आणि कृष्णाला प्रिय असल्यामुळे कलयुगात तुझी पूजा करणे मोक्षदायक ठरेल. परंतु तुला माझी पूजा करताना अर्पण करणे अशुभ मानले जाईल. तेव्हापासून श्रीगणेशाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानले जाऊ लागले.

 

Web Title: Ganesh chaturthi why tulas is not allowed to flow to ganpati but durva is poured know an intresting story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 03:32 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi 2025:  संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?
1

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 9 मृत्यू, 12 बेपत्ता; कुठे कुठे काय काय घडले
2

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 9 मृत्यू, 12 बेपत्ता; कुठे कुठे काय काय घडले

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप
3

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता
4

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.