
फोटो सौजन्य- pinterest
हनुमान जयंती हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे. हा उत्सव भक्त उत्साहात साजरा करतात. हा दिवस रामाचे विविध भक्त आणि शक्ती, बुद्धी आणि समर्पणाच्या रूपात हनुमान जयंतीला विशेष महत्त्व आहे. श्रद्धेनुसार त्यांचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेला झाला होता. त्यामुळे या दिवशी भक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक पूजा केली जाते. मंदिरामध्ये भजन कीर्तन, सुंदरकांड पठण आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी राशीनुसार दान केल्यास सर्व संकटे दूर होतात असे म्हटले जाते. राशीनुसार कोणत्या वस्तूंचे दान करायचे ते जाणून घ्या
पंचांगानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7.6 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि 2 एप्रिल रोजी सकाळी 7.41 वाजता संपणार आहे. अशावेळी उदय तिथीनुसार हनुमान जयंती 2 एप्रिल रोजी साजरा केले जाणार आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी मेष राशींच्या लोकांनी डाळिंब, टोमॅटो, गहू आणि रागीचे दान करणे खूप शुभ मानले जाते. ज्यामुळे सकारात्मकता मिळते.
या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी दूध, दही, तांदूळ, गव्हाचे पीठ आणि मीठ दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने पुण्य मिळते आणि येणारी संकटे दूर होतात.
या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी मुग, हिरव्या पालेभाज्या आणि फळ दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सुख-समृद्धी आणि आत्मविश्वासात वाढ होईल.
हनुमान जयंतीच्या दिवशी कर्क राशींच्या लोकांनी गरिबांना तांदूळ, साखर आणि नळाचे दान करावे. हे दान केल्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात.
सिंह राशींच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी सफरचंद, गुळ आणि भुईमुगाच्या शेंगाचे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात सकारात्मकता येते.
हनुमान जयंतीच्या दिवशी कन्या राशींच्या लोकांनी मूग, हिरव्या भाज्या आणि सरबताचे दान करणे शुभ मानले जाते. असं केल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतात.
या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढरे कपडे, साखर आणि वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने ग्रह समस्या दूर होते.
या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी लाल चंदन, मसूर डाळ आणि तांब्याच्या भांड्याचे दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सुख समृद्धी वाढते.
हनुमानाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या राशींच्या लोकांनी चण्याची डाळ, बेसनाचे लाडू आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यांचे दान करावे.
मकर राशींच्या लोकांना हनुमान जयंतीच्या दिवशी काळे तीळ, गोधडी आणि स्टीलची भांडी दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
कुंभ राशींच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी चप्पल बूट बॅग इत्यादी वस्तूंचे दान करावे. त्यामुळे शनिदोष दूर होण्यास मदत होते.
या राशींच्या लोकांसाठी हनुमान जयंती फायदेशीर मानली जाते. या दिवशी खिचडी बनवून गरजूंना आणि गरिबांना दान करणे शुभ मानले जाते. ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असतो. त्या ग्रहांनुसार योग्य वस्तू दान केल्यास अधिक सकारात्मक परिणाम मिळतो.
Ans: मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते.
Ans: हनुमान चालीसा पठण, रामनाम जप, मंदिर दर्शन आणि उपवास करणे लाभदायक ठरते