
महिषासुराचा जन्म हा देवी भागवत पुराण आणि मार्कंडेय पुराण मधील कथांनुसार सांगितला जातो. या कथेनुसार त्याच्या जन्मामागे एक रंजक आणि अद्भुत घटना आहे.
एका नगरात गंधर्वकन्या राहत होती. ही दिसायला अत्यंत सुंदर होती. एका ती नगरातील नदीत तिच्या गंधर्व कुळातील मैत्रीणींसह स्नानासाठी गेली होती. त्यावेळी तिथे एक ऋषि ध्यानस्थ होते. गंधर्व कन्येने या ऋषिंवर पाणी आणि चिखल उडवला त्यावर ऋषी रागावले आणि त्यांनी या गंधर्वकन्येला श्राप दिला की, ती तीचं सौंदर्य हरवून एका म्हशीचं रुप धारण करेन. हे ऐकून गंधर्वकन्येने ऋषिंची माफी मागितली. त्यावर ऋषींना या गंधर्वकन्येची दया आली. ते म्हणाले माझा श्राप कधीही खोटा ठरत नाही, पण तू दिवसभर म्हशीच्या रुपात वावरशील आणि रात्री तुझं अर्ध शरीर म्हशीचं आणि अर्ध स्त्रीचं असेल. पण जेव्हा तुझा विवाह होईल तेव्हा तुला पुत्र झाल्यावर तू या श्रापातून मुक्त होशील.
अशाच एका रात्री गंधर्वकन्या वनातून फिरत असताना तिच्यावर रंभासूराची दृष्टी पडली. हा असूर अत्य़ंत तेजस्वी होता. तो या गंधर्वकन्येच्या सौंदर्याला भाळला. तेव्हा या गंधर्वकन्येने रंभासूराला मिळालेल्या श्रापाबद्दल सांगितलं. रंभासुराने नंतर या कन्येशी विवाह केला. म्हशीच्या रुपातील कन्या महिषीच्या पोटी जन्माला आलेला पुत्र महिषा
महिषासुराने कठोर तप करून ब्रह्मदेव यांना प्रसन्न केले. त्याने वर मागितला की, “माझा वध कोणत्याही देव, दानव किंवा पुरुषाकडून होऊ नये.” ब्रह्मदेवांनी त्याला हे वरदान दिले. मात्र, स्त्रीकडून वध होण्याची शक्यता त्याने गृहित धरली नाही.या वरदानामुळे महिषासुर अत्यंत बलवान झाला आणि त्याने देवांना त्रस्त केले. तेव्हा महिषाच्या त्रासापासून वाचण्यासाठी देवांनी देवी पार्वतीकडे याचना केली. त्यानंतर देवीने दुर्गेचं रुप धारण केलं आणि महिषासुराचा वध केला. हीच कथा पुढे नवरात्री आणि विजयादशमीशी जोडली जाते, असं काही पुराणकथांमध्ये सांगितलं आहे.