
या उपक्रमाचा मुख्य उद्देश शिवरायांच्या जीवनकार्याची ओळख करून देणे,त्यांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रभक्ती व आदर्श प्रशासकीय व्यवस्थेची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हा होता. ‘किल्ले महोत्सव’ या संकल्पनेतून किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत तरुण पिढीमध्ये इतिहासाबाबत जागर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमात विजय लोहार सदस्य, भारत इतिहास संशोधक मंडळ यांनी “छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र” या विषयावर सखोल व्याख्यान दिले. रामराजे माने प्राध्यापक व विभागप्रमुख रसायनशास्त्र यांनी भूपाळगड स्वराज्याचा खंबीर रक्षक” या विषयातून भूपाळगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व उलगडले.
शिवगर्जना सादर करून राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण केली
धनश्री शिवाजी शिंदे यांनी आदर्श राजा शिवछत्रपती आणि त्यांची प्रशासकीय व्यवस्था या विषयावर विचार मांडले, तर कु. शरण्या अमोल जंगम बाल शिव व्याख्याती यांनी शिवबा राजे या विषयावर भावपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. गर्जा महाराष्ट्र माझा स्वरांगण ग्रुपकडून पोवाडा व शिवगीते सादर करण्यात आली. अवनी संदीप लाड यांनी शिवगर्जना सादर करून वातावरणात राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण केली.अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरण
या कार्यक्रमास तहसीलदार योगेश्वर टॉपे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, गटशिक्षणाधिकारी वैभव सराटे, नायब तहसीलदार अभिजित हजारे व विजय सांळुखे, मंडल अधिकारी फैय्याज मुलाणी, तलाठी शुभम यादव, सज्जन बाबर, प्रदीप गायकवाड आदींचे सहकार्य लाभले. गणेश भेंडे यांनी सूत्रसंचालन केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.