Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shree Swami Samarth : विटाळ की पवित्र ? महिलांच्या मासिक पाळीबाबत स्वामी समर्थांचे विचार काय होते ?

चार ते पाच दिवसांच्या होणाऱ्या मासिक पाळीला आज देखील विटाळ म्हटलं जातं मात्र महिलांच्या याच मासिकपाळीबाबत स्वामी समर्थांचे काय विचार होते ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 12, 2025 | 01:55 PM
विटाळ की पवित्र ? महिलांच्या मासिक पाळीबाबत स्वामी समर्थांचे विचार काय होते ?

विटाळ की पवित्र ? महिलांच्या मासिक पाळीबाबत स्वामी समर्थांचे विचार काय होते ?

Follow Us
Close
Follow Us:

पुराण काळापासून चालू आलेल्या रुढी परंपरांचा विचार केल्यास महिलांच्या मासिक पाळीला विटाळ समजलं जातं. देव धर्माच्या कार्यात मासिक पाळी असल्यास महिलेला अपवित्र समजण्याची अनिष्ट प्रथा सुरु होती. या पाच दिवसांच्या काळात वेगळं राहणं कोणाला शिवाशिव न करणं इतकं कठीण कुळाचार पाळले जात असायचे. महिलांच्या या मासिकपाळीबाबत स्वामी समर्थांचे काय विचार होते ते जाणून घेऊयात.

पाळी आली की सुरुवातीचे तीन ते चार दिवस वेगळं बसवलं जातं. देवघर, स्वयंपाकघरात त्या स्त्रीला येण्यास मज्जाव घातला जातो. इतकंच नाही तर स्त्रीशक्तीचं रुप असलेल्या देवीची करणं देखील अपशकुन मानला जातो. याबाबत अनेकं संतांनी तसंच समाजसुधारकांनी देखील याबाबत मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन केलं होतं.

कलर्स मराठी वाहिनीवरील श्री स्वामी समर्थ या मालिकेतही स्वामींचे मासिकपाळी बाबतचे विचार स्पष्ट केले आहेत. या मालिकेतील एका प्रसंगानुसार एका महिलेला पाळी आली असल्याने तिला बाजूला बसवलेलं असतं. स्वामी त्या महिलेला जेवण देतात. यावेळी अनेकांनी स्वामींच्या या वागण्याला विरोेध केला होता. त्यावेळी स्वामींनी त्या चार दिवसांचं महत्त्व सांगितलं होतं. पाळीच्या दिवसात महिलांना शारीरिक थकवा येतो म्हणून शेतीच्या आणि इतर कामातून त्यांना आराम मिळावा म्हणून चार ते पाच त्यांच्या हक्काच्या विश्रांतीसाठी असतात. मात्र याचा अर्थ मासिकपाळी विटाळ आहे असा होत नाही असं देखील या मालिकेतून स्वामींचे विचार दाखविण्यात आले होते.

श्री स्वामी समर्थ आणि औदुंबराचं झाड, काय आहे महत्त्व? औदुंबराची गाथा

काय सांगतात स्वामी समर्थ?

महिन्यातून 3 ते 4 दिवस महिलांना मासिक पाळी येते म्हणजे ती त्या महिलेल्या स्त्रित्वाची खूण आहे. मासिकपाळी म्हणजे विटाळ नव्हे तर एका जीवाला जन्म देण्याचं वरदान निसर्गाने महिलांना दिलेलं आहे. त्यामुळे ज्या पाळीमुळे जीव जन्माला येतो ती अपवित्र आणि विटाळ कशी असू शकेल? असं म्हणत स्वामींनी मासिकपाळी बाबतच्या अंधश्रद्धेला कधीही दुजोरा दिला नाही.

Swami Samarth : तारकमंत्र म्हणजे काय ? स्वामी समर्थांनी तारकमंत्र का लिहिला ? 

शास्त्रीय कारण पाहता, या तीन ते चार दिवसात रक्तस्त्राव जास्त झाल्याने अशक्तपणा जास्त येतो. पुर्वीच्या काळी घरची कामं करुनही महिला शेतातील कष्टाची कामं देखील करत असायच्या त्यामुळे त्यांना रोजच्या कष्टाच्या कामापासून आराम मिळावा यासाठी ते पाच दिवस वेगळं बसवणं गरजेचं होतं. जेणेकरुन त्या स्त्रीला विश्रांती घेता येईल. मात्र काही चुकीच्या समजुती या मोठ्या प्रमाणात पसरत गेल्या त्यामुळे मासिकपाळी विटाळ म्हटलं जातं होतं.

Web Title: Impure or sacred what were swami samarths thoughts on womens menstruation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Swami Samarth : ‘असा’ बनतो अक्कलकोटला स्वामी महाराजांचा प्रसाद
1

Swami Samarth : ‘असा’ बनतो अक्कलकोटला स्वामी महाराजांचा प्रसाद

Akkalkot : गुरूपौर्णिमेनिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
2

Akkalkot : गुरूपौर्णिमेनिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Guru Paunima 2025 : गुरुपैर्णिमेला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण का करतात ?
3

Guru Paunima 2025 : गुरुपैर्णिमेला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण का करतात ?

दत्तसंप्रदयाची निर्मिती कशी झाली ? दत्तात्रयांचे मूळ तीन अवतार कसे प्रकट झाले ?
4

दत्तसंप्रदयाची निर्मिती कशी झाली ? दत्तात्रयांचे मूळ तीन अवतार कसे प्रकट झाले ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.