Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shree Swami Samarth : दत्तगुरुंचा दृष्टांत आणि स्वामींची भेट; शंकररावांना स्वामींनी कसं वाचवलं ?

दत्तसंप्रदायातील श्री स्वामी समर्थांना मानणारा भाविक वर्ग मोठा आहे. दत्तगुरुंचा अवतार असलेले स्वामी समर्थ हे मानवी रुपातील साक्षात दैवी शक्तीच. या दैवी शक्तीपुढे सारं काही दुय्यम आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 12, 2026 | 01:59 PM
Shree Swami Samarth : दत्तगुरुंचा दृष्टांत आणि स्वामींची भेट; शंकररावांना स्वामींनी कसं वाचवलं ?
Follow Us
Follow Us:
  • दत्तगुरुंचा दृष्टांत आणि स्वामींची भेट;
  • शंकररावांना स्वामींनी कसं वाचवलं ?
दत्तसंप्रदायातील श्री स्वामी समर्थांना मानणारा भाविक वर्ग मोठा आहे. दत्तगुरुंचा अवतार असलेले स्वामी समर्थ हे मानवी रुपातील साक्षात दैवी शक्तीच. या दैवी शक्तीपुढे सारं काही दुय्यम आहे. एकदा झालं असं की, हैदराबादच्या निजामशाहीमध्ये शंकरराव रायबहाद्दूर कार्यरत होते. भौतिक सुखाची कमी नाहीच, ऐश्वर्य संपन्न असं त्यांचं वैभव होतं. एकदा शंकररावांना ब्रह्मसमंध या आजाराने ग्रासलं होतं. शंकररावांना अन्नपाणी गोड लागत नव्हतं.

दृष्ट लागावं असं वैभव असून देखील त्यांचं मन कशातच लागत नव्हतं. शंकररावांनी ब्राम्हण भोजन घातलं दान धर्म केलं पण तरीही त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही. शंकरराव दत्तगुरुंचे परमभक्त त्यांनी गाणगापूर गाठलं आणि दत्तगुरुंचं दर्शन घेतलं. पण तेच त्यांना काही केल्या फरक जाणवेना. शंकररावांना एकदा स्वप्नात दत्तगुरुंचा दृष्टांत झाला. दत्तगुरुंनी शंकररांना अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जाण्याचे सांगितलं. बरेच दिवस शंकरारावांना हेच एकच स्वप्नं पडत होतं. न राहून शेवटी शंकररावांनी पत्नीला बरोबर घेत अक्कलकोट गाठवलं. तिथे त्यांना सुंदराबाई भेटल्या. शंकरराव म्हणजे मला स्वामींची भेट घडवून द्या त्यावेळी सुंदराबाई म्हणाल्या मला तीन हजार रुपये द्यावे लागतील. तेव्हा शंकरराव म्हणाले मी तीन नाही दहा हजार देतो पण स्वामींची भेट घडवून द्या.

तेव्हा अक्कलकोटात स्वामी ध्यानस्त बसले होते. शंकरराव आल्याच कळताच स्वामी उठले आणि स्मशानभूमीतील एका थडग्यावर डोकं टेकवून ते निजले. तेव्हा सेवेकऱ्यांनी शंकररावांना सांगितलं की स्वामींनी तुमच्यावरचं मरण स्वत:वर घेतलं. त्यांनर स्वामी तिथून उठले आणि शंकररावांना घेऊन जवळच्या दर्ग्यात गेले. अक्कलकोट हे असं ठिकाण आहे जिथे हिंदू, मुस्लीम ऐक्य भावाने स्वामींच्या दर्शनास येत असत.

संपत्तीचा मोह, ‘असं’ झालं मल्हाररावांचं गर्वहरण; श्री स्वामी समर्थांना चक्क मेण्यातून पळवून नेण्याचा झालेला प्रयत्न

शंकररावांना घेऊन स्वामी दर्ग्यात गेले आणि तिथल्या फकीरांना शंकररावांनी जेऊ घातलं. शंकरराव तेव्हा मनातून समाधानी झाले. त्य़ांना झालेल्या ब्रह्मसमंध आजारावर स्वामींनी शंकररांना कडूनिंबाच्या पाल्याचं औषध दिलं. आता स्वामी वैद्य झाल्यावर कोणता आजार टिकणार होता. स्वामींनी शंकरावांना कडूनिंबाच्या पाल्याचा रस प्यायला दिला. हळूहळू शंकररावांनी तब्येत बरी व्हायला लागली. सुंदराबाईंना पैशांचा मोह होता त्यांनी शंकररावांकडे तीन हजार मागितले तेव्हा स्वानी म्हणाले सुंदराबाईंना पैशांची गरज नाही त्यापेक्षा मारुतीच्या मंदिराजवळ एक मठ बांध असं स्वामींनी शंकररांवांना सांगितलं. शंकररावांनी ती आज्ञा मान्य केली. अक्कलकोटात त्यांनी बांधलेलं भव्य मठ आजही आहे. कथेचा ताप्तर्य काय तर श्रीमंत असो किंवा गरीब असो वाट्य़ाला येणारे भोग कोणालाही चुकले नाही. पण जर तुम्ही तुमच्या गुरुंवर देवावर श्रद्धा ठेवलीत तर या भोगाची तीव्रता कमी होते,असं स्वामी सांगतात.

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !

श्रीपाद श्रीवल्लभ आणि गणेश चतुर्थीचा आहे खास संबंध, यामागची पुराणकथा तुम्हाला माहितेय का ?

Web Title: Shree swami samarth dattagurus vision and swamis meeting how did swami save shankarrao

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • hindu religion
  • navrashtra news
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
1

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण
2

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या
4

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.