Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palmistry: तळहातावरील ही रेषा देते सरकारी नोकरीचे संकेत, तुम्ही बनू शकता मोठे अधिकारी

हस्तरेषाशास्त्रानुसार, भाग्य रेषेवरून एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या भविष्याबद्दल बरेच काही जाणून घेता येते. भाग्यरेषा जीवनातील यश, संघर्ष, संपत्ती इत्यादींबद्दल सांगते. भाग्य रेषेला शनि रेषा असेही म्हणतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 16, 2025 | 11:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

भाग्य रेषेला शनि रेषा असेही म्हणतात. एखाद्या व्यक्तीचे भविष्य जाणून घेण्यासाठी, या रेषेकडे पाहण्यासोबतच, हाताच्या आकाराकडेदेखील विशेष लक्ष दिले जाते. असे मानले जाते की, भाग्यरेषा एखाद्या व्यक्तीच्या सांसारिक जीवनाशी संबंधित असते. तळहातावरील ही रेषा सांगते की, तुम्हाला यश मिळेल की नाही. आपल्या जीवनात कोणत्या प्रकारचे अडथळे आणि अडचणी येऊ शकतात. भाग्यरेषा बहुतेकदा जीवनरेषा, चंद्ररेषा, मस्तकरेषा किंवा हृदयरेषेपासून उद्भवते. आपल्या जीवनाबद्दल आणि यशाबद्दल तळहातावरील भाग्यरेषा काय सांगते, जाणून घ्या

या लोकांना घ्यावे लागते कठोर परिश्रम

हस्तरेषाशास्त्रानुसार, जर भाग्यरेषा जीवनरेषेपासून सुरू होऊन त्याच ठिकाणी संपत असेल, तर अशा लोकांना जीवनात यश आणि संपत्ती मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तुम्हाला जीवनात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पण तुम्ही तुमच्या कठोर परिश्रम आणि क्षमतेने आयुष्यात यश आणि संपत्ती मिळवू शकता. शिवाय, जर भाग्यरेषा मनगटाजवळ खूप खाली असलेल्या जीवनरेषेशी जोडलेली असेल, तर याचा अर्थ असा की व्यक्तीच्या आयुष्याचा सुरुवातीचा भाग त्याच्या पालकांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेवर आधारित असू शकतो.

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेदरम्यान वाचा ‘ही’ कथा, अडकलेली कामे होतील पूर्ण

ही लोक होतात यशस्वी

असे मानले जाते की जर भाग्यरेषा मनगटापासून सुरू होऊन थेट त्याच्या स्थानापर्यंत म्हणजेच शनि क्षेत्रापर्यंत पोहोचली तर ते खूप चांगले लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा की, अशा लोकांना आयुष्यात खूप यश मिळेल. जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील भाग्यरेषा चंद्राच्या क्षेत्रापासून उद्भवत असेल तर असे लोक इतरांच्या मदतीने किंवा प्रोत्साहनाने जीवनात मोठे यश मिळवू शकतात. या प्रकारची रेषा असलेले लोक राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात किंवा सामाजिक कार्यकर्ते देखील बनू शकतात.

या महिलांना मिळतात श्रीमंत जीवनसाथी

जर भाग्य रेषा सरळ असेल आणि चंद्राच्या क्षेत्रातून येणारी रेषा तिच्याशी जोडली गेली असेल तर अशा लोकांना स्त्री किंवा जीवनसाथीच्या मदतीने त्यांच्या आयुष्यात नशीब आणि संपत्तीमध्ये यश मिळते. हस्तरेषाशास्त्रानुसार, जर तुमच्याकडे अशी रेषा असेल तर तुम्ही केवळ कोणाच्या तरी आधारावर किंवा मदतीवर अवलंबून राहू नये. त्याऐवजी कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर जीवनात यश मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरीकडे, जर एखाद्या महिलेच्या हातातील चंद्र क्षेत्रापासून अशी रेषा भाग्यरेषेपर्यंत पोहोचली आणि त्यासोबत वरच्या दिशेने जाऊ लागली, तर ती सूचित करते की महिलेचा जीवनसाथी खूप श्रीमंत असेल.

Guru Parivartan: देवगुरु करणार राशीमध्ये परिवर्तन, या राशीच्या लोकांवर प्रभाव पडण्याची शक्यता

या लोकांना मिळू शकते सरकारी नोकरी

असे मानले जाते की, जर जीवनरेषेच्या मार्गावर कोणत्याही ठिकाणाहून एखादी फांदी निघून शनिऐवजी दुसऱ्या ग्रहाकडे गेली तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या गुणांवर आणि भविष्यावर होतो. याचा अर्थ असा की ज्या ग्रहाच्या जवळ रेषा गेली आहे त्याच्या गुणांनुसार तुम्ही आयुष्यात पुढे जाल. हस्तरेषाशास्त्रानुसार, जर भाग्यरेषा शनिच्या ऐवजी गुरु क्षेत्रापर्यंत पोहोचली तर ती व्यक्ती खूप ज्ञानी असते आणि समाजात प्रतिष्ठा आणि आदर मिळवते. तसेच, हे लोक त्यांच्या मेहनतीने आणि क्षमतेने भविष्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये उच्च पदावर अधिकारी बनू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Palmistry bhagya rekha in hand meaning and future prediction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळतील नवीन संधी
1

Budh Gochar 2026: बुधाच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळतील नवीन संधी

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
2

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Vastu Tips : ‘या’ ठिकाणी चुकूनही पैसे ठेवू नका अन्यथा…, वास्तू उपाय करतील अडचणींवर मात
4

Vastu Tips : ‘या’ ठिकाणी चुकूनही पैसे ठेवू नका अन्यथा…, वास्तू उपाय करतील अडचणींवर मात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.