Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha 2025: श्राद्धाच्या विधीमध्ये काळे तीळ का वापरले जातात? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा

सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केल्याने सर्व पूर्वजांना समाधान मिळतात. आज पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी श्राद्ध करुन तर्पण झाल्यानंतर पितरांना निरोप दिला जातो. श्राद्ध विधीमध्ये काळे तीळ का वापरले जातात, जाणून घ्य

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 21, 2025 | 09:16 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. या दिवशी ज्ञात आणि अज्ञात पूर्वजांना निरोप दिला जातो. सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे. एखाद्या विशिष्ट तिथीचे श्राद्ध चुकले असले तरीही, सर्व पितरांसाठी श्राद्ध-पिंड दान केले जाऊ शकते. पितृपक्षात काळ्या तिळांचा वापर सर्वाधिक केला जातो. कोणत्याही विधीमध्ये, पूर्वजांना अर्पण करण्यासह ते सर्वात आधी दिसून येते. या विधीत तिळाचा वापर पूर्वजांच्या कार्यासाठी आवश्यक मानला जातो. श्राद्ध विधीमध्ये काळे तीळ का वापरले जातात, जाणून घ्या

पूर्वजांसाठीच्या विधीमध्ये काळे तीळ वापरणे

गरुड पुराणानुसार, काळे तीळ आणि कुश गवत दोन्ही भगवान विष्णूच्या शरीरापासून उद्भवले. पौराणिक कथेनुसार, हिरण्यकश्यपूने त्यांचा मुलगा प्रल्हाद याला छळले तेव्हा भगवान विष्णू अत्यंत क्रोधित झाले. त्याक्षणी त्यांच्या शरीरातून घामाचे थेंब बाहेर पडले, जे जमिनीवर पडले आणि काळ्या तिळांमध्ये रूपांतरित झाले. म्हणूनच काळ्या तिळाला दिव्य आणि पवित्र मानले जाते. भगवान विष्णू हे पूर्वजांचे देवता मानले जात असल्याने पूर्वजांना पाणी अर्पण करताना काळ्या तिळाला विशेष महत्त्व आहे.

Zodiac Sign: सूर्यदेवाच्या आशीर्वादाने अमला योगाचा शुभ संयोग, कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

काळ्या तिळांमुळे पूर्वज होतात प्रसन्न

असे मानले जाते की, काळे तिळांमध्ये पूर्वजांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना नैवेद्य स्वीकारण्यास भाग पाडण्याची शक्ती असते. ज्यावेळी पाण्यासोबत काळे तीळ अर्पण केले जातात त्यावेळी पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे कुटुंबावर आशीर्वाद राहतात. ही परंपरा फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, काळ्या तिळांचा वापर पितृदोषापासून सुटका करण्यासाठी त्यासोबत शनि, राहू आणि केतू ग्रहांना शांत करण्यासाठी केला जातो. श्राद्धाच्या विधीवेळी काळे तीळ अर्पण केल्याने या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि कुटुंबावर सकारात्मक प्रभाव पडतो. काळे तीळ अर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असे देखील म्हटले जाते.

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला करा ‘हे’ उपाय केल्याने तुमच्या घरात येईल संपत्ती 

पांढऱ्या तिळाचा शुक्र ग्रहाशी संबंध

श्राद्धाच्या वेळी काळे तीळ वापरले जातात पांढरे नाही. ज्योतिषशास्त्रात, पांढऱ्या तिळाचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत. कारण याचा संबंध आनंद आणि समृद्धीशी संबंधित आहे. शुभ समारंभ, नैवेद्य आणि विधींमध्ये याचा वापर केला जातो. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी काळे तिळाचा वापर केला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pitru paksha 2025 sarvapitri amavasya why is black sesame used mythology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 09:16 AM

Topics:  

  • dharm
  • Pitru Paksha
  • religions

संबंधित बातम्या

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
1

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
2

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ
3

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या
4

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.