
फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये शनि ग्रहाला कर्म, शिस्त आणि न्यायाचा कारक मानले जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची महादशा सुरू झाली की जीवनात मोठे बदल घडू लागतात. शनिची महादशा म्हणजे केवळ अडचणींचा काळ वाटतो, पण प्रत्यक्षात हा काळ व्यक्तीला घडवणारा, शिकवणारा आणि योग्य मार्गावर आणणारा असतो. त्यामुळे शनिची महादशा प्रत्येकासाठी अशुभच असते असे नाही. शनिची महादशा शुभ असते की अशुभ आणि त्याचा व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची एक महादशा असते. पण त्यात शनिची महादशा सर्वांत प्रभावी आणि दीर्घ मानली जाते. शनिची महादशा साधारण 19 वर्ष चालते. या काळात शनि ग्रहाचा प्रभाव जीवनावरती जास्त असतो. मुळात शनि ग्रह हा कर्म, शिस्त आणि न्याय यांचा कारक ग्रह मानला जातो.
शनिची महादशा तुमचा जसा कर्म तसं फळ देते. तुमच्या चांगल्या वाईट कृतीचं फळ या महादशेत मिळतं. जर तुमचे कर्म चांगले असतील तर शनि तुमच्यासाठी अनेक शुभ संधी घेऊन येतो. जसे करिअरमध्ये प्रगती, स्थैर्य, पैसा, जबाबदारी वाढणे आणि प्रगतीचं फळ मिळणं. जर शनि अशुभ असेल तर अनेक आव्हांनाचा सामना देखील करावा लागतो. जसे की, अडचणी, विलंब, आर्थिक काळ, मानसिक तणाव आणि नात्यांमध्ये तणाव असे त्रास सतत जाणवू लागतात.
पण ही महादशा शिकवणारी असते यामध्ये तुम्ही संयम, कष्ट आणि शिस्त शिकता तरी अनेक जण लोकश्रद्धेनुसार, शनिच्या महादशेचा त्रास होऊ नये म्हणून शनिवारी शनिची पूजा करतात, दान करतात, तेलाचा दिवा लावतात. पण हे लक्षात ठेवा शनिची महदशा वाईट नाही हा आयुष्य घडवणारा एक काळ आहे.
घाईघाईत निर्णय घेऊ नयेत
प्रामाणिकपणा आणि मेहनत टिकवावी
शिस्तबद्ध जीवनशैली ठेवावी
नकारात्मक विचार टाळावेत
शनिवारी काळे तीळ, तेल या गोष्टींचे दान करावे
हनुमानजींची पूजा करावी
गरीब आणि गरजू लोकांना मदत करावी
ध्यान आणि साधना करावी
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ती पूर्णपणे कुंडलीतील शनीच्या स्थितीवर अवलंबून असते. चांगल्या स्थितीत शनि प्रगती देतो, तर वाईट स्थितीत अडथळे निर्माण होऊ शकतात.
Ans: शनि महादशा हा ज्योतिषातील एक महत्त्वाचा कालावधी आहे, जो साधारण 19 वर्षांचा असतो. या काळात शनीचा प्रभाव जीवनाच्या विविध क्षेत्रांवर पडतो.
Ans: हा काळ आत्मचिंतन, संयम आणि कर्मशुद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. योग्य मार्गाने चालल्यास मोठे यश मिळू शकते.