Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shree Swami Samarth : दत्तसंप्रदायात वड आणि औंदुबरच्या झाडांना इतकं महत्व का ? यामागे आहे एक पुराणकथा

दत्तसंप्रदायात वड (वटवृक्ष) आणि औदुंबर या दोन्ही झाडांना जेवढं मोठं आध्यात्मिक महत्त्व दिलं जातं. या झाडांना दत्तांना आपलं स्थान का मानलं ? काय आहे यामागील पुराणकथा जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 27, 2025 | 12:46 PM
Shree Swami Samarth : दत्तसंप्रदायात वड आणि औंदुबरच्या झाडांना इतकं महत्व का ? यामागे आहे एक पुराणकथा
Follow Us
Close
Follow Us:
  • वड आणि औंदुबरच्या झाडांना इतकं महत्व का ?
  • दत्तांनी दोन्ही वृक्षांना कोणता आशिर्वाद दिला ?
  • यामागे आहे एक पुराणकथा
दत्तसंप्रदायात वड (वटवृक्ष) आणि औदुंबर या दोन्ही झाडांना जेवढं मोठं आध्यात्मिक महत्त्व दिलं जातं. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या मठाभोवती एक वटवृक्ष आहे. ज्याला स्वामी भक्त प्रदक्षिणा मारतात. दत्तसंप्रदायात वड आणि औंदुबर यांना इतकं महत्व का दिलं जातं ते जाणून घेऊयात.

वड आणि औंदुबरबाबत एक पुराणकथा सांगितली जाते. असं म्हटलं जातं की, एके काळी भगवान दत्तात्रेय पृथ्वीवर भ्रमंती करत होते. ते जिथे जिथे जायचे तिथे त्यांना पाहण्यासाठी साधक, ऋषी, भक्त जमायचे. मात्र दत्तात्रेय नेहमी वृक्षांच्या सावलीत ध्यान करायला बसायचे—विशेषतः वड आणि औदुंबर झाडाखाली ते कायम ध्यानस्त असायचे.त्या वेळी या दोन्ही वृक्षांनी दत्तांकडे एक याचिका केली “ते म्हणाले प्रभू, आम्ही विशाल असूनही केवळ उभेच आहोत. आपल्या साधनेचा, आपल्या चैतन्याचा स्पर्श आम्हाला कधी मिळेल?”भगवान दत्तात्रेय त्यांच्या भक्तवत्सल स्वभावामुळे या वृक्षांवर अत्यंत प्रसन्न झाले. प्रथम वड वृक्षाला आशीर्वाद देत म्हणाले, “तू पृथ्वीवर स्थैर्य, शक्ती आणि अक्षयत्वाचे प्रतीक म्हणून पूजला जाशील. साधक तुझ्या सावलीत ध्यान केल्यास त्याच्या मनातील भीती व चंचलता नाहीशी होईल; त्याला धैर्य व दृढता प्राप्त होईल.” यामुळे वड दत्तसंप्रदायात स्थैर्य व सामर्थ्याचे चिन्ह मानले गेले.

Shree Swami Samarth : स्वामी समर्थांना स्मरणगामी का म्हणतात? तारक मंत्रातील या शब्दाचा अर्थ काय?

यानंतर दत्तांनी औदुंबर वृक्षाकडे पाहून त्याला म्हणाले, “तू माझ्या करुणा, दया आणि चैतन्याचे रूप होशील. जो भक्त तुझ्या पायाशी मनापासून प्रार्थना करेल त्याचे मानसिक दुःख दूर होईल, आणि तुझ्या छायेत जप करणाऱ्यावर माझी विशेष कृपा राहील.” यामुळे औदुंबराला दत्ताचे निवासस्थान मानले जाते.ही कथा सांगते की वड म्हणजे शक्ती व स्थैर्य, तर औदुंबर म्हणजे चैतन्य व करुणा. त्यामुळे आजही दत्तसंप्रदायात ही दोन्ही झाडे भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानली जातात.

शास्त्रीय कारण काय ?

वड आणि औदुंबर या दोन्ही वृक्षांना दत्तसंप्रदायात फक्त पुराणकथेमुळे नव्हे, तर शास्त्रीय कारणांमुळेही विशेष स्थान आहे. खरंतर अध्यात्म आणि विज्ञान याचा संगम दत्तसंप्रदायात दिसून येतो. वड आणि औंदुबर ही वृक्ष दिर्घकाळ जगणारी आहेत. शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिलं तर वडाचं झाडं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतं. वडाच्या झाडाखाली ध्यानस्त बसल्याने श्वसनासंबंधित आजार दूर होतात. बहुगुणी असं वडाचं झाडाचे औषधी गुणधर्म जास्त आहेत.

औदुंबर फळे, पानं, फुले, साल या सर्वांमध्ये औषधी घटक आढळता. पोटाचे विकार,मानसिक तणाव, रक्तदाब नियंत्रण इतकंच नाही तर त्वचा रोगावर औदुंबर अत्यंत परिणामकारक मानला जातो. त्याचबरोबर औंदुबर आणि वडाच्या झाडाखाली पाण्याचे साठे मोठ्या प्रमाणात असतात. या झाडांमुळे मातीची धूप रोखली जाते. यामुळे अशा बहुगुणी झाडांचं आपल्या आयुष्य़ात महत्व जास्त आहे. यांचे आभार मानण्यासाठी आणि त्याचं महत्व समजावं म्हणून दत्तसंप्रदायात या दोन्ही झाडांचा परमेश्वराचा अंश मानला जातो.

अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !

 

Navnath Gatha : गाथा नवनाथांची; दत्तसंप्रदायात नवनाथांचं महत्व काय ?

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: दत्तसंप्रदायात वड आणि औदुंबर झाडांना विशेष महत्त्व का दिलं जातं?

    Ans: वड स्थैर्य, शक्ती आणि अखंडता दर्शवतो, तर औदुंबर करुणा, चैतन्य आणि कृपा दर्शवतो. भगवान दत्तात्रेयांनी या दोन्ही वृक्षांना आशीर्वाद दिल्यामुळे त्यांना दत्ताचे स्वरूप मानले जाते.

  • Que: वडाच्या झाडाखाली ध्यान करणे शुभ का मानले जाते?

    Ans: वडाच्या झाडाखाली बसल्याने मन स्थिर होतं, भीती आणि चंचलता कमी होते. वड मोठ्या प्रमाणात शुद्ध हवा निर्माण करतो त्यामुळे मानसिक शांतताही मिळते.

  • Que: अक्कलकोटच्या मठात वडाच्या प्रदक्षिणेला का महत्व आहे?

    Ans: अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मठाभोवती असलेला वड वृक्ष ‘स्मरणगामी’ शक्तीचे प्रतीक मानला जातो. स्वामींच्या चैतन्याशी जोडणारा हा परंपरेचा भाग आहे.

Web Title: Shree swami samarth why are the vad and aundubar trees so important in the datta sampradaya there is a myth behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • Akkalkot
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

जय जय स्वामी समर्थ: स्वामींच्या कृपेने अक्कलकोटमध्ये नवा अध्याय, सावित्री आणि गौतमवर घातलेला धक्कादायक घाला उलगडणार
1

जय जय स्वामी समर्थ: स्वामींच्या कृपेने अक्कलकोटमध्ये नवा अध्याय, सावित्री आणि गौतमवर घातलेला धक्कादायक घाला उलगडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.