Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Varuthini Ekadashi: वल्लभाचार्य नक्की कोण होते? कुठे झाला जन्म जाणून घ्या संपूर्ण कथा

आज 13 एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी. महान कृष्णभक्त श्री वल्लभाचार्य यांचा जन्म चैत्र कृष्ण एकादशी (वरुथिनी एकादशी) याच दिवशी झाला होता. यानिमित्ताने त्यांच्या जीवनापुष्पाबद्दल जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 13, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • कोण आहेत वल्लभाचार्य
  • वल्लभाचार्याचा जन्म कुठे झाला
  • वल्लभाचार्याची काय आहे कथा
 

 

 

वल्लभाचार्य एक महान कृष्णभक्त होते. त्यांची असंख्य स्त्रोत कृष्णभक्तीची गोडी वाढवते. पुष्टीमार्गाचे संस्थापक आणि महान कृष्णभक्त, तत्वज्ञानी होते. साक्षात भगवंतांनी त्यांना दृष्टांत दिला असे सांगितले जाते. हे वल्लभाचार्य नक्की कोण होते? त्यांचा जन्म कुठे झाला. जाणून घेऊया

कोण आहेत वल्लभाचार्य

वल्लभाचार्य जयंती (श्री महाप्रभूजी) चैत्र कृष्ण एकादशीला साजरी केली जाते, जी हिंदू भक्ती चळवळीतील पुष्टीमार्गाचे संस्थापक आणि महान कृष्णभक्त, तत्वज्ञानी श्री वल्लभाचार्य यांचा जन्म चैत्र कृष्ण एकादशी (वरुथिनी एकादशी) दिवशी, इ.स. १४७९ (विक्रम संवत १५३५) मध्ये वाराणसीजवळील चंपारण्य (काही संदर्भानुसार, मूळ तेलगू ब्राह्मण कुटुंब) येथे झाला. वल्लभाचार्य यांनी ‘शुद्धाद्वैत’ सिद्धांताचा प्रसार केला आणि श्रीनाथजींच्या भक्तीचा मार्ग दाखवला. वल्लभाचार्य हे भक्ती चळवळीतील एक थोर संत आणि महान कृष्णभक्त म्हणून ओळखले जातात.

Varuthini Ekadashi: 12 की 13 एप्रिल कधी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

वल्लभ पंथ, शुद्धाद्वैती संप्रदाय, रुद्र संप्रदाय, पुष्टिमार्ग अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या एका भक्तीमार्गी वैष्णव संप्रदायाचे प्रवर्तक. ते तेलुगू ब्राह्मण होते. त्यांचे घराणे आंध्र प्रदेशातील कांकरव नावाच्या गावचे. कंकर खम्‌ल्ह, कांकरवाड ही याच गावाची पर्यायी नावे. वल्लभाचार्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मणभट्ट आणि आईचे इल्लमगरू. गणपतीभट्ट हे त्यांचे आजोबा आणि गंगाधरभट्ट हे पणजोबा. वल्लभाचार्यांचे घराणे सोमयाजी असून त्यांच्या घराण्यातील पुरुषांनी 100 सोमयज्ञ केले होते, असे म्हणतात. इ.स. १४७९ हे वल्लभाचार्यांच्या जन्माचे वर्ष मानले जात असले, तरी आख्यायिका असे सांगते की, लक्ष्मणभट्ट आपल्या कुटुंबियांसह वाराणसी (काशी) येथे असताना त्या शहरावर इस्लामी आक्रमण होणार, अशा वार्ता कानांवर येऊ लागल्या; त्यामुळे घाबरून लक्ष्मणभट्ट काशी सोडून अन्यत्र निघाले. वाट मध्य प्रदेशातील रायपूर जिल्ह्याच्या एका रानातून जात होती. या रानाचे नाव होते ‘चंपारण्य’. या रानातच इल्लमगरू प्रसूत होऊन तिच्या पोटी वल्लभाचार्यांचा जन्म १४८१ साली झाला.

वल्लभाचार्य आठ वर्षांचे होताच त्यांच्या वाडिलांनी त्यांचे उपनयन करून विष्णुचित्तनामक गुरुंकडे त्यांना अध्ययनार्थ पाठविले. वेदांचे अध्ययन त्यांनी अनेक गुरूंकडे केले. त्रिरम्मलय, अंधनारायण दीक्षित आणि माधवयतींद्र याचा यात समावेश होतो. हे सर्व माध्वमताचे होते; दरम्यान वल्लभाचार्यांना मात्र माध्वमत मान्य नव्हते. त्यांचा पंथ अद्वैती आहे. भागवत, ब्रह्मसूत्रे आणि गीता यांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. १४८९ साली आपले अध्ययन पूर्ण करून ते घरी परतले. त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी निघाले असता तिरुपती येथे त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यात्राकालात त्यांनी काशी व जगन्नाथपुरी येथील अनेक विद्वानांशी वादविवाद केला आणि ते वल्लभाचार्य म्हणून मान्यता पावले.

पुष्टिमार्गाची स्थापना

देवदमन वा श्रीनाथजी या रूपाने गोवर्धन पर्वतावर प्रकट होऊन श्रीकृष्णाने वल्लभाचार्यांना दृष्टान्त दिला आणि कृष्णमंदिर बांधून नवा भक्तिसंप्रदाय सुरू करण्यास सांगितले, अशी पुष्टिमार्गाच्या अनुयायांची श्रद्धा आहे.

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

वल्लभाचार्यांचे तत्त्वज्ञान ‘शुद्धाद्वैत’ या नावाने ओळखले जाते. वल्लभाचार्यांचा संप्रदाय नवा असला, तरी त्यांचे वेदान्त तत्त्वज्ञान त्यांनी विष्णुस्वामींच्या रुद्र संप्रदायातून घेतले. अग्नीपासून स्फुल्लिंग निघावेत, तसे ईश्वरापासून जीव निघतात. जीव हा शुद्ध ईश्वराचा शुद्ध अंश असून ईश्वर व जीव या दोघांत अद्वैत असते; ब्रह्म हे मायासंबंधरहित शुद्ध आहे, ही या तत्त्वज्ञानाची मूलभूत तत्त्वे आहेत.

पुष्टिमार्गातील भक्तीचे स्वरूप पाहता त्याचे अनुयायी श्रीकृष्णाला सर्वोच्च ब्रह्म मानतात. श्रीकृष्ण हा कर्ताही आहे; भोक्ताही आहे. स्वतःच्या इच्छेने तो जग निर्माण करतो. विष्णूच्या वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ असलेल्या व्यापिवैकुंठात राहून तो आपल्या भक्तांसह लीला करतो. कृष्णलीलांत सामील होणे, हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय होय.

वल्लभाचार्यांनी ८४ ग्रंथ रचिले, असे म्हणतात; दरम्यान त्यांच्या नावावर ३१ ग्रंथच असल्याचे दिसते. त्यांत विशेष महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे भागवतपुराणावरील सुबोधिनी ही टीका, तत्त्वार्थदीप अथवा तत्त्वदीपनिबंध, ब्रह्मसूत्र-अणुभाष्य, जैमिनीभाष्य आणि षोडशग्रंथ हे होत. षोडशग्रंथ हा १६ ग्रंथांचा एक समूह आहे. त्यात यमुनाष्टक, बालबोध, सिद्धांतमुक्तावली, पुष्टिप्रवाहमर्यादाभेद, सिद्धांतरहस्य, नवरत्न, अंतःकरणप्रबोध, विवेकधैर्याश्रय, कृष्णाश्रय, चतुःश्लोकी, भक्तिवर्धिनी, जलभेद, पंचपद्य, संन्यासनिर्णय, निरोधलक्षण आणि सेवाफल याचा समावेश होतो. याशिवाय त्यांनी मधुराष्टक, श्रीकृष्णाष्टक, गोपीजन-वल्लभाष्टक, अशी काही अष्टकेही लिहिली आहेत.

वल्लभाचार्यांनी अनेकदा तीर्थयात्रा केल्या. त्या करीत असताना त्यांनी आपल्या नव्या पंथाचाही प्रचार केला. त्यांना अनेक शिष्य लाभले. दामोदर, शंभू, स्वभू, स्वयंभू, कृष्णदास अधिकारी, कुंभन दास, परमानंद दास, सद्‌दू पांडे, रामदास चौहान, कृष्णदास यांचा त्यात समावेश केला जातो. अंधकवी आणि कृष्णभक्त सूरदास यांनीही त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते, असे म्हटले जाते.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वल्लभाचार्य कोण होते?

    Ans: वल्लभाचार्य हे महान कृष्णभक्त, तत्वज्ञानी आणि पुष्टीमार्गाचे संस्थापक होते.

  • Que: पुष्टीमार्ग म्हणजे काय?

    Ans: पुष्टीमार्ग हा श्रीकृष्ण भक्तीवर आधारित एक वैष्णव संप्रदाय आहे, ज्याची स्थापना वल्लभाचार्यांनी केली.

  • Que: वल्लभचार्यांनी कोणत्या देवतेची उपासना केली

    Ans: त्यांनी भगवान श्रीकृष्णाला सर्वोच्च मानून त्यांची भक्ती केली.

Web Title: Varuthini ekadashi 2026 who exactly was vallabhacharya and where was he born

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

Weekly Horoscope: एप्रिलचा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या
2

Weekly Horoscope: एप्रिलचा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Ketu Mahadasha: केतूच्या महादशेमुळे नशीब बदलते, कोणते ग्रह असतात जबाबदार
3

Ketu Mahadasha: केतूच्या महादशेमुळे नशीब बदलते, कोणते ग्रह असतात जबाबदार

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी शिललिंगावर या गोष्टी करा अर्पण, महादेवांचा राहील आशीर्वाद
4

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी शिललिंगावर या गोष्टी करा अर्पण, महादेवांचा राहील आशीर्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.