Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day: देशातील मुख्यमंत्र्यांना कसा मिळाला झेंडावंदन करण्याचा अधिकार? जाणून घ्या इतिहास

१९४७ ते १९७४ या कालावधीमध्ये देशातील कोणत्याही मुख्यमंत्र्यांना झेंडावंदन करता येत नसे. त्यानंतर मात्र आता प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 02, 2024 | 04:42 PM
Independence Day: देशातील मुख्यमंत्र्यांना कसा मिळाला झेंडावंदन करण्याचा अधिकार? जाणून घ्या इतिहास

Independence Day: देशातील मुख्यमंत्र्यांना कसा मिळाला झेंडावंदन करण्याचा अधिकार? जाणून घ्या इतिहास

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या देशाला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले होते. आपला भारत देश यंदा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांच्या या शौर्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. आपल्याला माहिती आहे की, १५ ऑगस्ट या दिवशी देशाचे पंतप्रधान राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झेंडावंदन करून संपूर्ण देशाला संबोधित करतात. तसेच प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री देखील झेंडावंदन करत असतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ देशाचे पंतप्रधानच झेंडावंदन करत असत. मात्र त्यानंतर प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री देखील झेंडावंदन करू लागले. तर मुख्यमंत्र्यांनी झेंडावंदन करण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आपण यामागची गोष्ट जाणून घेऊयात.

आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आहे. १९४७ ते १९७४ या कालावधीमध्ये देशातील कोणत्याही मुख्यमंत्र्यांना झेंडावंदन करता येत नसे. त्यानंतर मात्र आता प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करतात. १९७४ पर्यंत राज्यपालच प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करीत असत. भारताच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी १९७४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेऊन झेंडावंदन करण्याबाबतच्या नियमांत बदल करावे अशी मागणी केली. ज्या प्रकारे या दिवशी पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून झेंडावंदन करतात, त्याचप्रमाणे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना देखील झेंडावंदन करता येईल असा नियम करण्याची मागणी त्यांनी केली होती. राजमन्नार कमिटीच्या आधारे तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी इंदिरा गांधींकडे राज्यांना जास्तीचे अधिकार देण्याची मागणी केली. इंदिरा गांधी यांनी ही मागणी मान्य करत जुलै १९७४ मध्ये एक आदेश जारी केला. त्या आदेशानुसार प्रजासत्ताक दिनी राज्यपाल तर स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री झेंडावंदन करू लागले.

भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन, फोटो सौजन्य – (istockphoto)

केंद्र सरकारकडून हा आदेश जारी झाल्यानंतर १५ ऑगस्ट १९७४ मध्ये तामिळनाडूतील राजधानी असलेल्या चेन्नई येथे सेंट जॉर्ज किल्ल्यावर झेंडावंदन केले गेले. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी झेंडावंदन केले. त्यावर्षपासून देशातील सर्व मुख्यमंत्री झेंडावंदन करू लागले. राज्यांना जास्त अधिकार देण्याची मागणी एम. करुणानिधी यांनी राजमन्नार कमिटीच्या आधारे केली होती. मात्र ही कमिटी नक्की होती तरी काय आणि ती कशासाठी तयार करण्यात आली होती, याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

केंद्र सरकारने राजमन्नार कमिटीची स्थापना २२ सप्टेंबर १९६९ मध्ये केली होती. या कमिटीची स्थापन करण्याचा उद्देश हा केंद्र व राज्याच्या बाबतीत सूचना, किंवा सल्ला देणे हा होता. डॉ. पी.व्ही राजमिन्नार हे त्या कमिटीचे अध्यक्ष होते. एकूण तीन सदस्य या कमिटीत होते. १९७१ मध्ये तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार केंद्र सरकार राज्य सरकारांमध्ये गरजेपेक्षा जास्त दखल देत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांनी यामध्ये बदल करण्यासाठी अनेक सूचना या अहवालात देण्यात आल्या होते. मात्र केंद्र सरकारकडून या अहवालाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे म्हटले जाते.

Web Title: Independence day know from when state cm started flag hoisting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 05:30 PM

Topics:  

  • Independence Day
  • Independence Day 2024

संबंधित बातम्या

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
1

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
2

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
4

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.