Pandit Jawahar Lal Nehru on Indian Pakistan Partition
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानच्या निर्मितीच्या काही काळातच भारताने कट्टरतावाद आणि शांततेच्या विरोधातील शक्तींशी पुन्हा एकदा सामना करावा लागला. फाळणीच्या वेदनेतून सावरत असतानाच पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्द्यावरून भारतावर पहिले युद्ध लादले. या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भोपाळच्या नवाबाला ९ जुलै १९४८ रोजी लिहिलेल्या पत्रात भारत-पाकिस्तान संबंधांवरील आपल्या खोल चिंतेचा, दु:खाचा आणि निराशेचा उल्लेख केला आहे.
नेहरूंनी लिहिले की, फाळणी स्वीकारताना सर्वांना वाटले की वेदनादायक असले तरीही काही प्रमाणात शांतता साधता येईल. मात्र, वास्तविकतेने ही आशा चुरगाळली. फाळणीच्या हिंसाचारात तीस लाखांहून अधिक लोकांचे प्राण गेले, दीड ते साडेतीन कोटी लोक विस्थापित झाले, आणि समाजमनावर खोल जखमा उमटल्या. तरीही, पाकिस्तानने शांततेचा मार्ग स्वीकारला नाही, तर भारताविरोधात सातत्याने युद्ध आणि दहशतवादाचा मार्ग अवलंबला. नेहरूंच्या या पत्रात त्यांनी दु:खाने म्हटले आहे की, “आपण फाळणीला सहमती दिली कारण त्यातून थोडी शांती मिळेल असे वाटले, पण कदाचित आपण चुकलो.” त्यांनी याची कबुली दिली की, शांततेचा प्रयत्न अपयशी ठरल्यास एकच पर्याय शिल्लक राहतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भूकंपामुळे नाही, तर ‘या’ रहस्यमयी कारणांमुळे थरथरतेय धरती…’ संशोधनातून धक्कादायक गुढ उघड
महात्मा गांधींनाही फाळणीच्या प्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती दिली गेली नव्हती. काँग्रेसच्या बैठकीत महात्मा गांधींनी सौम्य तक्रार मांडली असतानाही नेहरू व पटेल यांनी त्यांच्या असहमतीला फारसे महत्त्व दिले नाही. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या लेखनानुसार, नेहरू-पटेल यांनी त्या काळात गांधींशी असभ्य वर्तन केल्याचे दिसते.
सरदार वल्लभभाई पटेल यांनीही फाळणी स्वीकारताना स्पष्टपणे सांगितले होते, “आम्ही विष वेगळे केले.” जातीय द्वेषाने भारलेल्या परिस्थितीत फाळणी अपरिहार्य झाली होती, असे पटेलांचे स्पष्ट मत होते. परंतु, पुढील घटनांनी सिद्ध केले की हे ‘विष’ वेगळे झाले तरीही ते भारताच्या जखमा चिघळविण्याचे काम करत राहिले.
पंडित नेहरूंनी त्यांच्या नेतृत्वकाळात सातत्याने भारत-पाकिस्तानमध्ये शांततेसाठी प्रयत्न केले, मात्र पाकिस्तानच्या आक्रमक धोरणामुळे त्यांना अनेकदा अपयश आले. स्टॅनली वुलपार्ट यांच्या “शेमफुल फ्लाइट” या पुस्तकात नेहरूंचे आत्मपरीक्षण उल्लेखले आहे “आपण योग्य करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपली पापे क्षमली जातील.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानमध्ये कलम 144 लागू; नक्की का आणि काय आहे यामागचे खरे कारण?
नेहरूंच्या दृष्टीने, शांतता ही अंतिम गरज होती, परंतु युद्ध टाळता येईलच असे निश्चित नव्हते. आजही त्यांच्या त्या काळच्या इशाऱ्याचा संदर्भ घेतला जातो, जेव्हा भारताला पाकिस्तानविरोधात सातत्याने संघर्ष करावा लागतो. शेवटी, नेहरूंनी लिहिलेल्या शब्दांतून हे स्पष्ट होते की, ‘भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये शांततेचा मार्ग अपयशी ठरल्यास, युद्ध हाच अंतिम आणि कटू पर्याय राहतो.’