Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खाऊ घालण्याचा ट्रेंड वन्यजीवांना ठरतोय जीवघेणा! वेफर्स, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक, फ्रेंच फ्राइज, रोटीने वन्यप्राण्यांचे हाल

जंगलभ्रमंती करताना, गडकिल्ले फिरताना माकड, वानरे, खार सारख्या प्राण्यांना मानवी पदार्थ सहज खाऊ घातले जातात. हे खाऊ घालणे वन्यजीवांसाठी घातक ठरत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 28, 2025 | 09:29 PM
Feeding trend is becoming fatal for wildlife! Wafers, pizza, burgers, cold drinks, French fries, bread are causing problems for wildlife

Feeding trend is becoming fatal for wildlife! Wafers, pizza, burgers, cold drinks, French fries, bread are causing problems for wildlife

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : निसर्गप्रेम आणि वन्यजीवांविषयी कुतूहल प्रत्येकालाच असते. मात्र, अलीकडच्या काळात जंगलभ्रमंती किंवा प्राणीसंग्रहालयात फिरताना प्राण्यांना मानवी खाद्यपदार्थ खाऊ घालण्याचा ‘ट्रेंड’ वन्यजीवांसाठी जीवघेणा ठरत आहे. वेफर्स, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक, फ्रेंच फ्राइज, रोटी हे पदार्थ हरीण, माकडे, अस्वल, आणि काही पक्ष्यांच्या तोंडात सहज दिसतात. तसेच जंगलभ्रमंती करताना, गडकिल्ले फिरताना माकड, वानरे, खार सारख्या प्राण्यांना मानवी पदार्थ सहज खाऊ घातले जातात. पर्यटकांना याचा आनंद वाटतो, पण प्रत्यक्षात ही ‘दयाळूपणा’ची नव्हे तर अविचाराची आणि अज्ञानाची कृती आहे.

हेही वाचा : किशोर कुमारच्या बंगल्यात विराट कोहली! आलिशान रेस्टॉरंटची केली सुरवात; रोटी-खिचडीची किंमत वाचून व्हाल अवाक

प्राण्यांचे नैसर्गिक अन्न आणि मानवी हस्तक्षेप

प्राणी त्यांच्या नैसर्गिक वातावरणात जे खातात, ते त्यांच्या शरीररचनेशी पूर्णपणे सुसंगत असते. त्यांच्या आहारात मीठ, तेल, मसाले किंवा साखर नसते. पण पर्यटकांनी दिलेले जंकफूड खाल्ल्याने त्यांना पचनविकार, स्थूलत्व, त्वचारोग, आणि लिव्हर किंवा किडनीच्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे अशा अन्नपदार्थांनी केवळ प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येत नाही, तर त्यांचे नैसर्गिक वर्तन, अन्नशोधाची सवय आणि शिकारीची प्रवृत्तीही कमी होते. हे परिसंस्थेतील संतुलनासाठीही धोकादायक आहे.

वनविभाग आणि प्रशासनाचे प्रयत्न

या वाढत्या समस्येकडे वनविभाग आणि पस्थानिक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले आहे. अनेक ठिकाणी ‘प्राण्यांना खाऊ घालू नका’ अशा सूचनाफलकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्हीद्वारे पर्यटकांवर लक्ष ठेवले जात आहे.

संवेदनशील पर्यटनाची गरज

वन्यजीवांकडे पाहताना आपण पाहुणे आहोत, मालक नाही हे पर्यटकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
प्राण्यांना मानवी अन्न देऊन आपण त्यांना ‘आनंद’ देत नाही, तर त्यांच्या आयुष्याशी खेळत आहोत. निसर्गाचा सन्मान म्हणजे हस्तक्षेप न करणे होय. जेव्हा त्यांना सहजपणे आयते अन्न मिळते, तेव्हा त्यांची अन्न शोधण्याची नैसर्गिक क्षमता कमी होते. यामुळे ते मानवी वस्तीकडे आकर्षित होतात आणि मानव-वन्यजीव संघर्ष वाढतो.

भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत कोणत्याही वन्य प्राण्याला अन्न देणे, त्रास देणे किंवा त्यांच्या नैसर्गिक वर्तनात हस्तक्षेप करणे हा दंडनीय गुन्हा आहे. दंड आणि तुरुंगवास या दोन्ही शिक्षा त्यासाठी होऊ शकतात.

हेही वाचा : मोहम्मद शमीचे ऐकावेच लागेल! Ranji Trophy मध्ये पुन्हा दाखवली जादू; भारतीय संघात प्रवेशासाठी निवडकर्त्यांना चोख उत्तर

‘आपण प्राण्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करून त्यांना सवयी लावतो, आणि मग त्यांचे नैसर्गिक चक्र कोसळते. पवन्यजीवांना खाऊ घालने हे जरी पुण्याचे काम वाटत असले तरी आपण त्यांच्या नैसर्गिक चक्रात बाधा आणत आहोत. तसेच मानव प्राणी संघर्ष ही या मुळे वाढू शकतो. त्यामुळे
जागरूकता हीच पहिली पायरी आहे. जंगलभ्रमंती म्हणजे फक्त छायाचित्र काढणे नव्हे, तर जबाबदारीही आहे.’
अमित सिंग, पर्यावरण तज्ञ ‘मानवी अन्नातील मीठ आणि तेल प्राण्यांच्या पचनसंस्थेसाठी घातक आहे. एकदा हे पदार्थ चाखल्यानंतर काही प्राण्यांना त्याची सवय लागते आणि ते नैसर्गिक अन्न टाळू लागतात. परिणामी त्यांच्या आरोग्याचा आणि वर्तनाचा समतोल बिघडतो.’ डॉ. कुणाल मुनाळे, प्राणीतज्ञ आणि पशुवैद्य

Web Title: The trend of feeding wafers pizza burgers french fries is becoming fatal for wildlife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 09:28 PM

Topics:  

  • Wildlife Protection Act

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.