
World Wildlife Day 2026
आजच्या धापळीच्या जगात वन्यजीवांच्या प्रजाती झपाट्याने नष्ट होत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, जंगलातील पक्ष्यांची चहचहाट आणि प्राण्यांचा नैसर्गिक आवाज कमी होणे हे मानवाला मानसिकदृष्ट्या आजारी पाडत आहे. जेव्हा एखादी प्रजाती नष्ट होती, तेव्हा निसर्गातील एक विशिष्ट संगीत कायमचे हरवते. ज्याचा मानवी जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळेच दरवर्षी ०३ मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिवस साजरा केला जातो. ज्याचा उद्देश मानवी जीवनात वन्य प्राणी आणि वनस्पतींचे नेमकं काय महत्व आहे हे पटवनू देणे आहे.
सध्याच्या २०२६ च्या आधुनिक युगात आजच्या दिवसाचे महत्व अधिक व्यापक झाले आहे. यामुळे यावर्षीची थीम ही औषधी आणि सुगंधी वनस्पती : आरोग्य, वारसा आणि उपजीविकेचे संवर्धन यावर आधारित आहे. वन्यजीवांची होत असलेली ऱ्हास आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध किती महत्वाचा आहे, तसेच वनस्पतींचा अतिवापर आणि अधिवास नष्ट होण्यापासून संरक्षण करण्याची गरज अधोरेखित करणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे.
ही संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) २० डिसेंबर २०१३ रोजी, ०३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला होता. याच दिवशी १९७३ मध्ये वन्यजीवानांच्या संरक्षणासाठी Convention on International Trade in Endangered Species करार करण्यात आला होता. वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींची अवैध तस्करी थांबवणे आणि त्याच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे हा यामागचा मूळ उद्देश होता.
२०२६ ची संकल्पना ही वनस्पतींवर आधारित आहे. अधिकृत डेटानुसार, जगातील जवळपास ९५% लोकसंख्या आजही प्राथमिक उपचारांसाठी निसर्गावर अवलंबून आहे. तुळस, अश्वगंधा यांसारख्या औषधी वनस्पती आपला सांस्कृतिक वारसा आहे. परंतु बदलत्या हवानामुळे आणि वनस्पतींच्या अवैध तस्करीमुळे यांचा अधिवास नष्ट होत चालला आहे. ज्यामुळे वनस्पती आणि त्यावर जगणाऱ्या प्राण्यांचे आणि मानवाचे जीवन धोक्यात आले आहे. यामुळे या वनस्पतींचे महत्त्व पटवून देऊन त्याचा होणार अतिवापर रोखणे आणि तस्करीला आळा घालणे अत्यंत महत्वाचे आहे.
दुसरीकडे वाघ, हत्ती, चित्ता यांसारखे अनेक प्राण्यांच्या प्रजाती देखील कमी होत चालल्या आहेत. यामुळे मानवी मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, याला Eco-Anxiety म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते, जैवविधतेचे संवर्धन न केल्यास जगात नैराश्य आणि चिंतेचे प्रमाण ४५% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे वन्यजीवांचे संरक्षण करणे हे मानवाच्या मानसिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.