फोटो सौजन्य - सोशल मिडिया
क्रिकेट विश्वामधील दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजाराने तर क्रिकेटला अलविदा केला आहे . मागील अनेक वर्ष भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे त्याने क्रिकेटला अलविदास असे म्हटले जात आहे. मागील एक वर्ष तो सोनी स्पोर्ट्सवर त्याचबरोबर क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कॉमेंट्री करताना दिसत होता. त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करून क्रिकेट राम राम केला आहे. या अनुभवी खेळाडूने सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
ज्यामध्ये त्याने एक भावनिक चिठ्ठी लिहिली आणि क्रिकेटच्या सर्व स्वरूपांना निरोप दिला. चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारतीय जर्सी घालणे, राष्ट्रगीत गाणे आणि मैदानावर पाऊल ठेवताना प्रत्येक वेळी सर्वोत्तम देणे – याचा खरा अर्थ शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. पण जसे ते म्हणतात, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट झालाच पाहिजे आणि अपार कृतज्ञतेने मी भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार!”
Wearing the Indian jersey, singing the anthem, and trying my best each time I stepped on the field – it’s impossible to put into words what it truly meant. But as they say, all good things must come to an end, and with immense gratitude I have decided to retire from all forms of… pic.twitter.com/p8yOd5tFyT
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) August 24, 2025
चेतेश्वर पुजाराची टीम इंडियामध्ये बऱ्याच काळापासून निवड होत नव्हती. निवडकर्त्यांचे लक्ष आता नवीन आणि तरुण खेळाडूंकडे लागले आहे. पुजाराने त्याचा शेवटचा कसोटी सामना ७ जून २०२३ रोजी खेळला. पुजाराने त्याचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे खेळला. या सामन्यात त्याची कामगिरी फारशी खास नव्हती. पुजाराने या सामन्याच्या पहिल्या डावात १४ धावा आणि दुसऱ्या डावात २७ धावा केल्या.
चेतेश्वर पुजाराने टीम इंडियासाठी १०३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले. त्याने १०३ कसोटी सामन्यात फलंदाजी करताना ७१९५ धावा केल्या. या दरम्यान त्याचा सर्वोत्तम धावसंख्या २०६ धावा होती. पुजाराने कसोटी सामन्यात १९ शतके, ३५ अर्धशतके आणि ३ द्विशतके केली. याशिवाय पुजाराने एकदिवसीय सामन्यात फक्त ५१ धावा केल्या.