फोटो सौजन्य – X/BCCI
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये काल पाच सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेमध्ये दोन्ही संघाची कामगिरी कौतुकास्पद राहिली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात धुमाकूळ घातला. त्याने सामन्यात एकूण ९ बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. सिराजने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेचा माजी अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ओव्हलमध्ये सिराजच्या पाच बळींची भविष्यवाणी केली होती.
स्टेनची भविष्यवाणी खरी ठरल्यानंतर सिराजने आता प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या दिग्गजाला हृदयस्पर्शी उत्तर दिले. सिराजच्या शानदार कामगिरीमुळे भारताने पाचवा सामना ६ धावांनी जिंकला. मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. ओव्हलमध्ये सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी, स्टेनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले, “पाचव्या कसोटीत सिराज पाचवा बळी घेईल.” असे त्याने भाकित केले होते
Prophecy fulfilled 🔮
Mohammed Siraj delivers on Dale Steyn’s prediction before The Oval Test 👊#WTC27 | #ENGvIND | ✍️ https://t.co/czi0iO1FUH pic.twitter.com/ICQ4d7jdwl
— ICC (@ICC) August 5, 2025
भारताच्या संघाचा सामना संपल्यानंतर आता, सिराजने स्टेनच्या पोस्टला उत्तर दिले आणि लिहिले, “तू म्हणालास आणि मी ते केले. खूप खूप धन्यवाद.” त्याने हृदयाचा इमोजी देखील जोडला. सोशल मीडियावर सिराजचे खूप कौतुक होत आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “सिराजने हृदय जिंकले.” दुसऱ्याने म्हटले, “सिराजने त्याच उर्जेने आणि तीव्रतेने १० डाव खेळले. भारतीय संघाला तुमच्यासारखा गोलंदाज मिळाल्याचे भाग्य लाभले आहे. शाब्बास मियां भाई.”
ओव्हल कसोटीनंतर सिराज म्हणाला की, तो नेहमीच असा विश्वास ठेवतो की तो कोणत्याही परिस्थितीतून संघाला विजय मिळवून देऊ शकतो. सोमवारी सिराजने शेवटच्या चारपैकी तीन बळी घेतले. तो म्हणाला, “मला नेहमीच असा विश्वास होता की मी कोणत्याही परिस्थितीतून संघाला विजय मिळवून देऊ शकतो आणि सकाळी मी तेच केले.
माझी एकमेव रणनीती म्हणजे योग्य ठिकाणी गोलंदाजी करणे. विकेट घेतल्या की धावा गमावल्या हे महत्त्वाचे नाही.” सिराज मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. त्याने पाच सामन्यांमध्ये २३ बळी घेतले. त्याच्यानंतर यादीत इंग्लंडचा जोश टंग आहे. टंगने १९ बळी घेतले.