Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK : कोच गौतम गंभीरने जिंकली चाहत्यांची मन! भारताचा विजय सैन्याला केला समर्पित, पाकिस्तानचे केले तोंड बंद

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांसोबत एकता व्यक्त केली. गंभीरने प्रसारकांशी बोलताना ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे आभार मानले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 15, 2025 | 10:12 AM
फोटो सौजन्य - सोनी लिव्ह

फोटो सौजन्य - सोनी लिव्ह

Follow Us
Close
Follow Us:

मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील सामना पार पडला, या सामन्यात भारताच्या संघाने पाकिस्तानला धूळ चारली. आशिया कप २०२५ मध्ये १४ सप्टेंबर रोजी भारताने पाकिस्तानवर ७ विकेटने शानदार विजय मिळवल्यानंतर, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांसोबत एकता व्यक्त केली. गंभीरने प्रसारकांशी बोलताना ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे आभार मानले.

विजयानंतर गौतम गंभीर काय म्हणाला?

खरं तर, भारताने एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सीमेवर ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे प्रत्युत्तर दिले होते. आता भारताने क्रिकेटच्या मैदानावरही पाकिस्तानकडून बदला घेतला आहे. रविवारी, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला आणि आशिया कप २०२५ मध्ये सलग दुसरा विजय मिळवला.

IND vs PAK : सामना जिंकल्यानंतर सुर्याने पहलगाम पीडितांना आणि सैन्याला विजय केला समर्पित! पाकच्या जखमांवर चोळले मीठ

या सामन्यातील विजयानंतर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हा विजय भारतीय सैनिकांना समर्पित केला. सामन्यानंतर ते म्हणाले, “एक संघ म्हणून आम्हाला पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबांसोबत उभे राहायचे होते. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या आमच्या सैनिकांचे आभार.” गंभीरचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कपमध्ये पाकिस्तानवरील विजय भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केला होता. 

सामन्यानंतर सादरीकरणादरम्यान सूर्यकुमार म्हणाला, “फक्त एक गोष्ट सांगायची आहे. ही योग्य संधी आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांसोबत आम्ही उभे आहोत. आम्ही आमची एकता व्यक्त करतो. आम्ही हा विजय आमच्या शूर सैनिकांना समर्पित करू इच्छितो. त्यांचे शौर्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. आशा आहे की, आम्ही मैदानावर चांगले प्रदर्शन करून त्यांना हसण्यासाठी अधिक कारणे देऊ.”

Gautam Gambhir shares his thoughts following India’s triumph over Pakistan 💬 Watch the #DPWorldAsiaCup2025, from Sept 9-28, 7 PM onwards, LIVE on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #INDvPAK pic.twitter.com/CWS1L6CaCu — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 14, 2025

भारताचा पाकिस्तानवर ७ विकेट्सनी विजय

आशिया कप २०२५ च्या सहाव्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. साहिबजादा फरहानने ४४ चेंडूत ४० धावांची खेळी केली, परंतु उर्वरित फलंदाज अपयशी ठरले. शेवटी, शाहीन आफ्रिदीने १६ चेंडूत नाबाद ३३ धावा करून संघाचा धावसंख्या १२७ धावांवर नेला. भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव (३/१८) आणि अक्षर पटेल (२/१८) यांनी शानदार गोलंदाजी केली.

प्रत्युत्तरादाखल भारताने लक्ष्याचा सहज पाठलाग केला. टीम इंडियाने १५.५ षटकांत ३ गडी गमावून विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या. त्याच्याशिवाय अभिषेक शर्माने १३ चेंडूत जलद ३१ धावा केल्या आणि तिलक वर्माने ३१ चेंडूत ३१ धावांची महत्त्वाची खेळी केली.

Web Title: Ind vs pak coach gautam gambhir wins fans hearts dedicated india victory to the army

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • India vs Pakistan
  • Suryakumar Yadav
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs USA : नाणेफेक सोडून कर्णधार सूर्या अचानक गेला कुठे? हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने होत आहे Viral
1

IND vs USA : नाणेफेक सोडून कर्णधार सूर्या अचानक गेला कुठे? हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने होत आहे Viral

‘मिया मॅजिक’च्या कमालीच्या कामगिरीनंतर खेळाडू झाला भावूक! म्हणाला – ही फक्त देवाची कृपा… पहा Video
2

‘मिया मॅजिक’च्या कमालीच्या कामगिरीनंतर खेळाडू झाला भावूक! म्हणाला – ही फक्त देवाची कृपा… पहा Video

IND vs USA : सुंदर-बुमराहच्या फिटनेसबद्दल सूर्यकुमार यादवने दिली मोठी अपडेट, विजयानंतरही कर्णधार खूश नाही…
3

IND vs USA : सुंदर-बुमराहच्या फिटनेसबद्दल सूर्यकुमार यादवने दिली मोठी अपडेट, विजयानंतरही कर्णधार खूश नाही…

IND vs USA : विजयी सुरुवात आणि विश्वविक्रम… टीम इंडियाने यूएसला पराभूत करुन रचला इतिहास!
4

IND vs USA : विजयी सुरुवात आणि विश्वविक्रम… टीम इंडियाने यूएसला पराभूत करुन रचला इतिहास!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.