सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यपचा घटस्फोट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारताची अनुभवी बॅडमिंटन स्टार आणि ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने तिच्या निर्णयाने सर्वांना धक्का दिला आहे. माजी जागतिक नंबर-१ बॅडमिंटन स्टार सायना आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. सायनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती शेअर करून देशभरातील बॅडमिंटन चाहत्यांना धक्का दिला आहे. सायना आणि भारताचा माजी नंबर-१ पुरुष बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यप यांनी दीर्घ नात्यानंतर २०१८ मध्ये लग्न केले. आता ७ वर्षांनंतर दोघांचेही हे नाते तुटले आहे. या निर्णयाने सर्वांना नक्कीच धक्का बसला आहे.
आम्ही शांतता निवडत आहोत – सायना
३५ वर्षीय अनुभवी भारतीय स्टार सायनाने रविवारी, १३ जुलै रोजी रात्री उशिरा इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही घोषणा केली, ज्यामुळे या जोडप्याच्या लाखो चाहत्यांची मने तुटली. सायनाने तिच्या निवेदनात म्हटले आहे की, “आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, प्रगती निवडत आहोत आणि सावरत आहोत”
त्यांच्या वेगळे होण्याचे खरे कारण अद्याप कळलेले नसले तरी, सायनाने कश्यपसोबत घालवलेल्या क्षणांबद्दल आनंद व्यक्त केला. सायनाने लिहिले की, “या आठवणींसाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे. अशा वेळी आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि त्यांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.” असेही तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
IND Vs ENG : वॉशिंग्टनचा ‘सुंदर’ चौकार! इंग्लंडचा डाव गडगडला; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य..
२०१८ मध्ये केलं होतं लग्न
सायना आणि ३८ वर्षीय कश्यप यांचे अगदी लहानपणापासून एकमेकांवर प्रेम होते आणि गेल्या ७ वर्षांपासून लग्न झाले होते. दोघांनीही २०१८ मध्ये लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले, कारण बराच काळ या दोन्ही स्टार्सनी त्यांचे नाते मीडिया आणि चाहत्यांच्या नजरेपासून दूर ठेवले होते. असे म्हटले जाते की त्यांच्या नात्याची सुरुवात त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात झाली होती.
दोघांची भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत झाली होती, जिथे ते दोघेही दिग्गज प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेत होते. येथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. मात्र आता अनेक वर्षानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेत नक्कीच चाहत्यांना धक्का दिला आहे.
सायनाची पोस्ट
सायनाने शेअर केली आयजी स्टोरी
कारण काय ठरले?
सायना आणि पारूपल्लीने लग्न करूनही धक्का दिला होता. त्यांच्या अफेरच्याही कधी चर्चा झाल्या नाहीत आणि आता ते वेगळे होत आहेत तर यावरूनही कधीच चर्चा झाल्या नाहीत. त्यामुळे या जोडप्याने सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे. मात्र या जोडीने कायम एकत्र रहावे असंच सर्वांना वाटत होते हे नक्की. सायना आणि पारूपल्ली यांचे लहानपणापासून एकत्र असणे आणि आता वेगळे होणे हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे आणि अचानक घेतलेल्या या निर्णयाने सर्वच बुचकळ्यात पडले आहेत.
IND Vs ENG : मोहम्मद सिराजचा लॉर्ड्सवर मोठा कारनामा! भारताच्या ‘या’ दिग्गज गोलंदाजाला टाकले मागे..