
T20 World Cup 2026: Bangladesh's new Sports Minister issues statement to improve relations with India
T20 World Cup 2026 : बांगलादेशमध्ये नवीन सरकारची स्थापना झाली आहे, पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, तारिक रहमान यांनी गेल्या वर्षभरात बिघडलेले भारताशी संबंध सुधारण्यावर अधिक भर देत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, बांगलादेशचे नवीन क्रीडामंत्री अमिनुल हक यांनी म्हटले आहे की, त्यांना भारताशी संबंध सुधारायचे आहेत. क्रीडामंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, अमिनुल हक यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी सांगितले की, त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि भारताशी संबंध सुधारायचे असून सर्व समस्या लवकर सोडवायच्या आहेत.
हेही वाचा : पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाद वसीमच्या X पत्नीने मोहसीन नक्वीकडे केले अपील! पती ‘खुनी’ असल्याचा केला आरोप
क्रीडामंत्री अमिनुल हक म्हणाले की, “शपथ घेतल्यानंतर, मी संसद भवनात भारताच्या उप-उच्चायुक्तांची भेट घेतली आहे. मी त्यांच्याशी टी-२० विश्वचषकाबद्दल चर्चा केली. ही चांगली चर्चा झाली. मी त्यांना सांगितले की आम्हाला संवादाद्वारे हा प्रश्न लवकर सोडवायचा असून आम्हाला सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध कायम राखायचे आहेत.” अमीनुल हक म्हणाले, “आम्हाला खेळ आणि इतर क्षेत्रात भारताशी चांगले संबंध पाहिजे आहेत. राजकीय अडचणींमुळे आम्ही टी-२० विश्वचषक खेळू शकलो नाही. जर चर्चा झाली असती तर त्या समस्या सोडवल्या असत्या आणि आमचा संघ विश्वचषकाचा भाग देखील झाला असता.”
बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हिंसाचारानंतर, बीसीसीआयकडून केकेआरला बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला त्यांच्या आयपीएल २०२६ संघातून मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर केकेआरने बोर्डाच्या आदेशाचे पालन करून मुस्तफिजूर रहमानला मुक्त केले. त्यानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने २०२६ विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दर्शवून आयसीसीला त्यांचे सामने श्रीलंकेला हलवण्याची विनंती केली होती.
आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळून लावली आणि त्यांच्या सरकारच्या सल्ल्यानुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत बांगलादेशऐवजी, आयसीसीने स्कॉटलंडला समाविष्ट केले.
या खेळीसह शिवम दुबेने एक मोठा विक्रम देखील रचला. शिवम दुबे आता टी-२० विश्वचषकात ५ व्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी, हा विक्रम हार्दिक पंड्याच्या नावावर जमा होता, ज्याने २०२२ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ६३ धावा फटकावल्या होत्या. या यादीत युवराज सिंगचे नाव देखील सामील आहे. त्याने २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ५८ धावांची खेळी केली होती. दुबेच्या या खेळीने त्याला या विशेष यादीत अव्वल स्थानावर पोहचवले.
T20 World Cup 2026 : उशिरा सुचले शहाणपण! बांगलादेशच्या नव्या क्रीडामंत्र्यांचा भारताशी संबंध सुधारण्यावर भर; जारी केले निवेदन
Bangladesh Cricket Team, Bangladesh Cricket Board, Sports Minister Aminul Haque, Bangladesh Government, Indian Cricket Team, ICC, BCCI, Marathi Sports News, बांगलादेश क्रिकेट संघ, बांग्लादेश क्रिकेट बोर्ड, क्रीडामंत्री अमिनुल हक, बांग्लादेश सरकार, भारतीय क्रिकेट संघ, आयसीसी, बीसीसीआय , मराठी क्रीडा बातम्या
बांगलादेशमध्ये नवीन सरकारची स्थापना झाली. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, तारिक रहमान यांनी भारताशी संबंध सुधारण्यावर अधिक भर देण्याचे ठरवले आहे, या अनुषंगाने नवीन क्रीडामंत्री अमिनुल हक यांनी याबाबत पावले उचलली आहेत.