
T20 World Cup 2026: 'Give yourself some time..' Abhishek, who was dismissed for zero, was given a mantra by 'this' legend to return to form
Sunil Gavaskar’s commentary on Abhishek Sharma : भारतीय संघातील स्फोटक सलामीवीर आणि टी-२० चा नंबर वन फलंदाज अभिषेक शर्मा सलग तीन सामन्यांमध्ये ० धावांवर माघारी गेला आहे. ज्यामुळे भारतीय संघाच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान, माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनी आता अभिषेकच्या सतत बाद होण्यावर भाष्य केले आहे. गावस्कर यांनी तरुण अभिषेक शर्माला या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी एक मंत्र दिला आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर यांनी अभिषेकबद्दल म्हटले आहे की, “कदाचित त्याच्यावर अपेक्षांचा भार जास्त आहे. जर त्याने पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात केली असती तर परिस्थिती काही वेगळी राहिली असती. पण आता, तुम्हाला असे वाटू शकते की मोठा खेळाडू, षटकार मारणारा आणि संघातील नंबर वन फलंदाज होण्याच्या अपेक्षा त्याच्यावर जास्त आहेत.”
माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणाले की, “मला वाटते की, त्याच्याकडे असलेल्या विविध शॉट्स पाहता, त्याला मध्यभागी स्वतःला थोडा जास्त वेळ देण्याची जास्त गरज आहे. त्याला त्याच्या डावाची सुरुवात चौकार किंवा षटकाराने करावी लागत नाही. जर तो असे करत असेल तर ते ठीकच आहे, परंतु त्याला मोठा शॉट मारण्यासाठी रेषेपलीकडे खेळण्याची काही एक आवश्यकता नाही. जरी चार डॉट बॉल गेले तरी काही फरक पडत नाही कारण तो पुढील चार ते आठ चेंडूंमध्ये त्याची भरपाई करू शकतो.” गावस्कर यांनी शर्माला “स्मार्ट क्रिकेट” खेळण्याचा तसेच कोणत्याही पूर्वकल्पित अपेक्षा पूर्ण न करण्याचा सल्ला दिला.
सुनील गावस्कर पुढे म्हणाले की, “त्याला त्याच्या पायांमध्ये रक्ताभिसरण सुधारावे लागणार आहे. त्याला सुरुवात करावी लागेल. जर तुम्ही भारतासाठी खेळत असाल तर तुम्हाला सुरुवात करावी लागेल आणि सर्वकाही ठीक होईल.”
सुनील गावस्कर पुढे म्हणाले की, “अभिषेक शर्मा ज्या पद्धतीने बाद होत आहे ते खूपच अंदाजे आहे. वास्तविक पाहता मानसिकता अशी आहे की, ‘मला २०० स्ट्राईक रेट गाठू शकणारा खेळाडू म्हणून पाहिले जात आहे, मला त्याप्रमाणे जगावे लागेल.’ तुम्हाला ते करण्याची गरज नाही. ते अगदीच नैसर्गिक आहे. जेव्हा तुम्ही काही एकेरी धावा करता तेव्हा तुम्हाला खेळपट्टीची जाणीव होत असते. एकदा तो सेट झाला की तो मोठ्या धावा करेल.”