
कंपनीने काय सांगितले?
अॅडिडासने भारतातील आपल्या टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशनमधील काही पोझिशन कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे मान्य केले आहे. बदलत्या व्यावसायिक गरजांनुसार ऑपरेटिंग मॉडेलशी जुळवून घेणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे कंपनीने सांगितले. संघटनेतील काही प्रक्रिया सोप्या करणे, महत्त्वाच्या तांत्रिक क्षमता मजबूत करणे आणि भविष्यातील व्यावसायिक गरजांसाठी कंपनीला तयार करणे, हेही या बदलाचे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
iQOO 16 चीनमध्ये लाँच होण्यापूर्वी चर्चेत; किंमत, दमदार बॅटरी, डिस्प्ले आणि खास फीचर्स जाणून घ्या
700 पैकी 350 कर्मचाऱ्यांवर परिणाम?
गुरुग्राममधील अॅडिडास इंडिया टेक हबमध्ये सुमारे 700 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 350 किंवा त्याहून जास्त कर्मचाऱ्यांवर कपातीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे एकूण कर्मचारीसंख्येच्या सुमारे 45% ते 50% कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. पण हा आकडा अॅडिडासने अद्याप निश्चित केलेला नाही.
कर्मचाऱ्यांना दोन गटांत विभागले
15 सप्टेंबर रोजी झालेल्या टाउन हॉल बैठकीत कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे. काही कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी एक्झिट लेटर देण्यात आले, तर दुसऱ्या गटातील कर्मचाऱ्यांना डिसेंबरपर्यंत कंपनीत राहण्यास सांगितले आहे. या काळात त्यांना इतर टेक हबमधील सहकाऱ्यांकडे कामाचे हस्तांतरण करावे लागणार आहे. अंतर्गत दुसरी भूमिका मिळाली नाही, तर 15 डिसेंबर हा त्यांचा शेवटचा कामाचा दिवस ठरू शकतो. मात्र, सेव्हरन्स किंवा नोटीस पेबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
अॅमेझॉनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा नेटवर्क विस्तार; २० नवीन फुलफिलमेंट सेंटर्ससह १५० डिलिव्हरी स्टेशन
भारतातील टेक ऑपरेशन्सचा विस्तार
गुरुग्राममधील कार्यालयात अॅडिडासचे स्थानिक मार्केटिंग ऑपरेशन आणि ग्लोबल इंजिनिअरिंग टेक हब आहे. कंपनीने भारतातील उपस्थिती वाढवताना 2024 मध्ये चेन्नईमध्ये ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस सेंटरही सुरू केले होते. आता टेक विभागातील ही कर्मचारी कपात कंपनीच्या जागतिक तंत्रज्ञान आणि ऑपरेशनल रचनेतील बदलांकडे लक्ष वेधणारी ठरत आहे.