माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. “जनता मालक आणि अधिकारी सेवक आहेत, मात्र अधिकारीच मालक झाल्यासारखे वागत आहेत,” असे म्हणत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवर टीका केली. मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ५ तारखेचे नियोजित आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असले तरी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अण्णांनी दिला आहे. याचबरोबर राज्यातील आणि देशातील फोडाफोडीच्या राजकारणावरही त्यांनी नाराजी व्यक्त करत वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केली.
माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. “जनता मालक आणि अधिकारी सेवक आहेत, मात्र अधिकारीच मालक झाल्यासारखे वागत आहेत,” असे म्हणत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवर टीका केली. मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ५ तारखेचे नियोजित आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असले तरी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अण्णांनी दिला आहे. याचबरोबर राज्यातील आणि देशातील फोडाफोडीच्या राजकारणावरही त्यांनी नाराजी व्यक्त करत वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केली.