बारावीच्या जीवशास्त्र पेपरला भरारी पथकाने रावेर येथील जीजी हायस्कूल येथे भेट दिली. यावेळी झूम कॅमेऱ्यात शाळेतील अकरा विद्यार्थी कॉपी करताना आढळले. भरारी पथकाने या 11 विद्यार्थ्यांवर कारवाई देखील केली. मात्र दोन तासातच हा अहवाल बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. राजकीय दबावातून हा अहवाल बदलण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सदर संस्थाचालक हा भाजपचा पदाधिकारी असल्याने दबावातून हा अहवाल बदलला गेला अशी चर्चा सुरू झाली आहे. कॅमेऱ्यात कॉपी करताना आढळलेले विद्यार्थी अचानक निर्दोष कसे झाले ? दोन तासातच अहवाल कोणाच्या सांगण्यावरून बदलविण्यात आला असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून केंद्र संचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मी कारवाई केली होती मात्र हा अहवाल नंतर कोणाच्या सांगण्यावरून बदलविण्यात आला असा सवाल भरारी पथकाच्या प्रमुख स्वाती हवेली यांनी उपस्थित केला आहे.
बारावीच्या जीवशास्त्र पेपरला भरारी पथकाने रावेर येथील जीजी हायस्कूल येथे भेट दिली. यावेळी झूम कॅमेऱ्यात शाळेतील अकरा विद्यार्थी कॉपी करताना आढळले. भरारी पथकाने या 11 विद्यार्थ्यांवर कारवाई देखील केली. मात्र दोन तासातच हा अहवाल बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. राजकीय दबावातून हा अहवाल बदलण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सदर संस्थाचालक हा भाजपचा पदाधिकारी असल्याने दबावातून हा अहवाल बदलला गेला अशी चर्चा सुरू झाली आहे. कॅमेऱ्यात कॉपी करताना आढळलेले विद्यार्थी अचानक निर्दोष कसे झाले ? दोन तासातच अहवाल कोणाच्या सांगण्यावरून बदलविण्यात आला असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून केंद्र संचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मी कारवाई केली होती मात्र हा अहवाल नंतर कोणाच्या सांगण्यावरून बदलविण्यात आला असा सवाल भरारी पथकाच्या प्रमुख स्वाती हवेली यांनी उपस्थित केला आहे.