एकीकडे संपूर्ण राज्यात अभिमानाने महाराष्ट्र दिन साजरा होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी घटना समोर आली. अशा विकृत प्रवृत्तींना रोखण्यासाठी गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. कायदे अधिक कडक झाले तरच अशा घटनांवर प्रभावी आळा बसू शकतो, असं मत स्त्रीवादी अभ्यासक डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी व्यक्त केलंय. बदलत्या काळात समाजामध्ये संस्कार आणि मूल्यांची घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे मुलांना लहान वयापासूनच योग्य-अयोग्याची जाणीव करून देणं ही प्रत्येक पालकाची जबाबदारी असल्याचं मत कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज वाडेकर यांनी व्यक्त केलंय. अत्याचाराच्या, छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूला घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिली. समाजात सुरक्षित आणि संवेदनशील वातावरण निर्माण करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. संस्कार, जागरूकता आणि कठोर कायदा या तिन्ही गोष्टींचा समतोल साधला तरच अशा घटनांना आळा बसू शकतो.
एकीकडे संपूर्ण राज्यात अभिमानाने महाराष्ट्र दिन साजरा होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी घटना समोर आली. अशा विकृत प्रवृत्तींना रोखण्यासाठी गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. कायदे अधिक कडक झाले तरच अशा घटनांवर प्रभावी आळा बसू शकतो, असं मत स्त्रीवादी अभ्यासक डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी व्यक्त केलंय. बदलत्या काळात समाजामध्ये संस्कार आणि मूल्यांची घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे मुलांना लहान वयापासूनच योग्य-अयोग्याची जाणीव करून देणं ही प्रत्येक पालकाची जबाबदारी असल्याचं मत कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज वाडेकर यांनी व्यक्त केलंय. अत्याचाराच्या, छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूला घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिली. समाजात सुरक्षित आणि संवेदनशील वातावरण निर्माण करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. संस्कार, जागरूकता आणि कठोर कायदा या तिन्ही गोष्टींचा समतोल साधला तरच अशा घटनांना आळा बसू शकतो.